मेट्रो-३ मार्गिकेचा आरे ते वरळीपर्यंतचा प्रवास सुस्साट

बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यान १६३७७ जणांनी केला प्रवास


मुंबई (प्रतिनिधी) : मेट्रो-३ मार्गिकचा बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारी सकाळपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला झाला. आता आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी हा गारेगार प्रवास भूमिगत मेट्रोने अवघ्या ६० रुपयांत करता येणार आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत आरे ते वरळी या मार्गावर ३२,७९१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉरिशनमार्फत (एमएमआरसी) देण्यात आली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो-३ (अॅक्वालाईन) च्या बीकेसी मेट्रो स्थानक ते आचार्य अत्रे मेट्रो स्थानकापर्यंतच्या टप्पा २-अचे लोकार्पण शुक्रवारी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मुंबई मेट्रो-३ एक्वालाईनच्या टप्पा २ अ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) चा सेवा विस्तार करण्यात आला. शनिवारपासून नागरिकांसाठी हा टप्पा खुला करण्यात आला. आरे ते वरळी या मार्गावर ३२,७९१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला, तर बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यान पहिल्याच दिवशी १६३७७ जणांनी केला प्रवास केला.


मेट्रो-३ मार्गावर सोमवार ते शनिवारी पहिली मेट्रो सकाळी ६.३० वाजता तर शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता असणार आहे. रविवारी सकाळी पहिली मेट्रो सकाळी ८.३० वाजता तर शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता असणार आहे. मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्यात बीकेसी, धारावी, शीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके आहेत. मेट्रो-३ चा वरळी ते कुलाबा हा शेवटचा टप्पा ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेत येईल.


वरळीतून फिनिक्स मॉलला जाणे सोयीचे व्हावे यासाठी मॉलतर्फे वरळी मेट्रो स्थानकावरून गाडलांची सोय करण्यात आली आहे. पासाठी मॉलकडून मुंबई मेट्रो रेल कॉरिशनसोबत करार करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यातधारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक आहे, तर तिसरा टप्यात वरळी ते कफ परेड व अंतिम टप्पा पूर्ण झाल्यावर, नेहरू विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, अँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड यांसारख्या स्थानकांचा समावेश असेल,

Comments
Add Comment

Marine Technology : आधुनिक सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणणार; मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने

Nitesh Rane : मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या, मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या

Pandharpur : पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी

Heatstroke : अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम उपाययोजना करणार

मुंबई : हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना बसत आहे

Tarapur MIDC : तारापूर औद्योगिक क्षेत्रात चाललंय काय ? अहवाल सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकाराबद्दल औद्योगिक भूखंडाची

Youth : ‘युवकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य