मेट्रो-३ मार्गिकेचा आरे ते वरळीपर्यंतचा प्रवास सुस्साट

बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यान १६३७७ जणांनी केला प्रवास


मुंबई (प्रतिनिधी) : मेट्रो-३ मार्गिकचा बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारी सकाळपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला झाला. आता आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी हा गारेगार प्रवास भूमिगत मेट्रोने अवघ्या ६० रुपयांत करता येणार आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत आरे ते वरळी या मार्गावर ३२,७९१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉरिशनमार्फत (एमएमआरसी) देण्यात आली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो-३ (अॅक्वालाईन) च्या बीकेसी मेट्रो स्थानक ते आचार्य अत्रे मेट्रो स्थानकापर्यंतच्या टप्पा २-अचे लोकार्पण शुक्रवारी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मुंबई मेट्रो-३ एक्वालाईनच्या टप्पा २ अ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) चा सेवा विस्तार करण्यात आला. शनिवारपासून नागरिकांसाठी हा टप्पा खुला करण्यात आला. आरे ते वरळी या मार्गावर ३२,७९१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला, तर बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यान पहिल्याच दिवशी १६३७७ जणांनी केला प्रवास केला.


मेट्रो-३ मार्गावर सोमवार ते शनिवारी पहिली मेट्रो सकाळी ६.३० वाजता तर शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता असणार आहे. रविवारी सकाळी पहिली मेट्रो सकाळी ८.३० वाजता तर शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता असणार आहे. मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्यात बीकेसी, धारावी, शीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके आहेत. मेट्रो-३ चा वरळी ते कुलाबा हा शेवटचा टप्पा ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेत येईल.


वरळीतून फिनिक्स मॉलला जाणे सोयीचे व्हावे यासाठी मॉलतर्फे वरळी मेट्रो स्थानकावरून गाडलांची सोय करण्यात आली आहे. पासाठी मॉलकडून मुंबई मेट्रो रेल कॉरिशनसोबत करार करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यातधारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक आहे, तर तिसरा टप्यात वरळी ते कफ परेड व अंतिम टप्पा पूर्ण झाल्यावर, नेहरू विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, अँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड यांसारख्या स्थानकांचा समावेश असेल,

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार