पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदा पाकिस्तानकडून गोळीबार नाही, शांततेत गेली रात्र

  76

नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनंतर जम्मू-काश्मीर आणि नियंत्रण रेषेजवळील इतर भागात ११-१२ची रात्र शांततेत गेली.कोणत्याही प्रकारच्या घटनेची माहिती समोर आलेली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदा शेजारील देशाकडून कोणत्याही प्रकारची कुरापत समोर आलेली नाही. भारतीय लष्कराने ही माहिती दिली.


१० मेच्या संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा करार झाला त्यानंतर दोन्ही देशांनी शांतता कायम राखण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानकडून तीन तासांतच शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्यात आले आणि भारतातील काही शहरांमध्ये ड्रोनने हल्ला करण्यात आला. भारतीय लष्करानेही प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन्स पाडले. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सातत्याने जम्मू-काश्मीरच्या सीमेलगतच्या भागांमध्ये गोळीबर करत होता. याला भारताच्या लष्करानेही तोडीस तोड उत्तर दिले. ७ ते १० मे दरम्यान पाकिस्तानन भारताची अनेक सैन्य ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले. तसेच त्यांच्या एअरबेसचेही मोठे नुकसान केले.



६-७मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर


६-७मेच्या रात्री भारताच्या वायूदलाकडून ऑपरेशन सिंदूर लाँच करण्यात आले. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यात १००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच चवताळला आणि त्यांनी सातत्याने भारतावर ड्रोन आणि मिसाईल्सचा हल्ला केला. ७ ते १० मे दरम्यान दोन्ही देशांदरम्यान तणावाची स्थिती होती.



पहलगाम हल्ल्यानंतर केले होते ऑपरेशन सिंदूर


जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते तर अनेक जण जखमी झाले होते. या २६ पर्यटकांमध्ये एका नेपाळी नागरिकाचा समावेशही होता. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६-७ मेच्या रात्री कारवाई केली आणि १००हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

Comments
Add Comment

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली

देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक