IPL 2025बाबत मोठी बातमी, १७ मेपासून पुन्हा सुरू होणार IPL सामने, या दिवशी रंगणार फायनल

मुंबई: टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. १७ मेपासून आयपीएलच्या सामन्यांना पुन्हा सुरूवात केली जात आहे. तर ३ जून ला या स्पर्धेचा फायनल सामना रंगणार आहे. ६ स्थानांवर आयपीएलचे एकूण १७ सामने खेळवले जाणार आहे. या नव्या कार्यक्रमात दोन डबल हेडरचा समावेश आहे. दोन रविवारी हे सामने खेळवले जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती.

 


१७ मे ते ३ जून रंगणार सामने


नव्या कार्यक्रमानुसार, आयपीएल २०२५मधील शेवटचे उरलेले १७ सामने ६ विविध ठिकाणांवर खेळवले जातील. हे सामने १७ मे पासून सुरू होती आणि शेवटचा सामना ३ जून २०२५मध्ये खेळवला जाईल. या वेळेस प्रेक्षकांना एकाच दिवशी दोन सामन्यांची मजाही घेता येणार आहे. हे डबल हेडर सामने रविवारी आयोजित केले जातील.

दरम्यान, बीसीसीआयने हे स्पष्ट केलेले नाही की कोणते सामने कोणत्या मैदानावर होणार आहे. मात्र लवकरच सर्व स्थळांची अधिकृत घोषणा केली जाईल.

प्लेऑफ सामन्यांचा कार्यक्रम घोषित


आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांचा कार्यक्रमही घोषित करण्यात आला आहे. हा टप्पा लीगचा सर्वात रोमांचक टप्पा असतो. यात अव्वल ४ संघ खिताब मिळवण्यासाठी आमनेसामने असतात.

पहिला क्वालिफायर - २९ मे २०२५
एलिमिनेटर - ३० मे २०२५

दुसरा क्वालिफायर - १ जून २०२५

फायनल सामना - ३ जून २०२५
Comments
Add Comment

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील

Virat Kohli Ideal RCB team : एबीपासून स्टार्कपर्यंत दिग्गजांचा समावेश; जाणून घ्या किंग कोहलीचा ऑल टाईम फेव्हरेट आरसीबी संघ

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीसाठी आपली ‘ऑल-टाइम

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा

पाकिस्तानच्या 'या' खेळाडूला आपलाच संताप पडला महागात; आयसीसीकडून डिमेरिट पॉइंटची शिक्षा

पाकिस्तानचा फलंदाज सलमान आघा Salman Agha पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावबाद झाल्यानंतर