IPL 2025बाबत मोठी बातमी, १७ मेपासून पुन्हा सुरू होणार IPL सामने, या दिवशी रंगणार फायनल

मुंबई: टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. १७ मेपासून आयपीएलच्या सामन्यांना पुन्हा सुरूवात केली जात आहे. तर ३ जून ला या स्पर्धेचा फायनल सामना रंगणार आहे. ६ स्थानांवर आयपीएलचे एकूण १७ सामने खेळवले जाणार आहे. या नव्या कार्यक्रमात दोन डबल हेडरचा समावेश आहे. दोन रविवारी हे सामने खेळवले जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती.

 


१७ मे ते ३ जून रंगणार सामने


नव्या कार्यक्रमानुसार, आयपीएल २०२५मधील शेवटचे उरलेले १७ सामने ६ विविध ठिकाणांवर खेळवले जातील. हे सामने १७ मे पासून सुरू होती आणि शेवटचा सामना ३ जून २०२५मध्ये खेळवला जाईल. या वेळेस प्रेक्षकांना एकाच दिवशी दोन सामन्यांची मजाही घेता येणार आहे. हे डबल हेडर सामने रविवारी आयोजित केले जातील.

दरम्यान, बीसीसीआयने हे स्पष्ट केलेले नाही की कोणते सामने कोणत्या मैदानावर होणार आहे. मात्र लवकरच सर्व स्थळांची अधिकृत घोषणा केली जाईल.

प्लेऑफ सामन्यांचा कार्यक्रम घोषित


आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांचा कार्यक्रमही घोषित करण्यात आला आहे. हा टप्पा लीगचा सर्वात रोमांचक टप्पा असतो. यात अव्वल ४ संघ खिताब मिळवण्यासाठी आमनेसामने असतात.

पहिला क्वालिफायर - २९ मे २०२५
एलिमिनेटर - ३० मे २०२५

दुसरा क्वालिफायर - १ जून २०२५

फायनल सामना - ३ जून २०२५
Comments
Add Comment

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन