IPL 2025बाबत मोठी बातमी, १७ मेपासून पुन्हा सुरू होणार IPL सामने, या दिवशी रंगणार फायनल

  57

मुंबई: टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. १७ मेपासून आयपीएलच्या सामन्यांना पुन्हा सुरूवात केली जात आहे. तर ३ जून ला या स्पर्धेचा फायनल सामना रंगणार आहे. ६ स्थानांवर आयपीएलचे एकूण १७ सामने खेळवले जाणार आहे. या नव्या कार्यक्रमात दोन डबल हेडरचा समावेश आहे. दोन रविवारी हे सामने खेळवले जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती.

 


१७ मे ते ३ जून रंगणार सामने


नव्या कार्यक्रमानुसार, आयपीएल २०२५मधील शेवटचे उरलेले १७ सामने ६ विविध ठिकाणांवर खेळवले जातील. हे सामने १७ मे पासून सुरू होती आणि शेवटचा सामना ३ जून २०२५मध्ये खेळवला जाईल. या वेळेस प्रेक्षकांना एकाच दिवशी दोन सामन्यांची मजाही घेता येणार आहे. हे डबल हेडर सामने रविवारी आयोजित केले जातील.

दरम्यान, बीसीसीआयने हे स्पष्ट केलेले नाही की कोणते सामने कोणत्या मैदानावर होणार आहे. मात्र लवकरच सर्व स्थळांची अधिकृत घोषणा केली जाईल.

प्लेऑफ सामन्यांचा कार्यक्रम घोषित


आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांचा कार्यक्रमही घोषित करण्यात आला आहे. हा टप्पा लीगचा सर्वात रोमांचक टप्पा असतो. यात अव्वल ४ संघ खिताब मिळवण्यासाठी आमनेसामने असतात.

पहिला क्वालिफायर - २९ मे २०२५
एलिमिनेटर - ३० मे २०२५

दुसरा क्वालिफायर - १ जून २०२५

फायनल सामना - ३ जून २०२५
Comments
Add Comment

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी

बंगळूरू चेंगराचेंगरी : आरसीबीसह आणखी दोघांविरोधात एफआयआर दाखल

बंगळूरू: बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर अखेर गुन्हा दाखल

श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

कोलंबो - श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला मॅच फिक्सिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका

Bangalore Stampede प्रकरणावर विराटने दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई: बंगळुरूत बुधवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा नाहक बळी गेला. या

RCB vs PBKS: ना कोहली, ना हेझलवूड, कृणाल पांड्या ठरला आरसीबीचा खरा हिरो

मुंबई: १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी विजेतेपदाचा आनंद आला. आरसीबीने

IPL चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्सलाही मिळाले कोट्यावधी रूपये

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला. ३ जूनला नरेंद्र मोदी