IPL 2025बाबत मोठी बातमी, १७ मेपासून पुन्हा सुरू होणार IPL सामने, या दिवशी रंगणार फायनल

मुंबई: टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. १७ मेपासून आयपीएलच्या सामन्यांना पुन्हा सुरूवात केली जात आहे. तर ३ जून ला या स्पर्धेचा फायनल सामना रंगणार आहे. ६ स्थानांवर आयपीएलचे एकूण १७ सामने खेळवले जाणार आहे. या नव्या कार्यक्रमात दोन डबल हेडरचा समावेश आहे. दोन रविवारी हे सामने खेळवले जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती.

 


१७ मे ते ३ जून रंगणार सामने


नव्या कार्यक्रमानुसार, आयपीएल २०२५मधील शेवटचे उरलेले १७ सामने ६ विविध ठिकाणांवर खेळवले जातील. हे सामने १७ मे पासून सुरू होती आणि शेवटचा सामना ३ जून २०२५मध्ये खेळवला जाईल. या वेळेस प्रेक्षकांना एकाच दिवशी दोन सामन्यांची मजाही घेता येणार आहे. हे डबल हेडर सामने रविवारी आयोजित केले जातील.

दरम्यान, बीसीसीआयने हे स्पष्ट केलेले नाही की कोणते सामने कोणत्या मैदानावर होणार आहे. मात्र लवकरच सर्व स्थळांची अधिकृत घोषणा केली जाईल.

प्लेऑफ सामन्यांचा कार्यक्रम घोषित


आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांचा कार्यक्रमही घोषित करण्यात आला आहे. हा टप्पा लीगचा सर्वात रोमांचक टप्पा असतो. यात अव्वल ४ संघ खिताब मिळवण्यासाठी आमनेसामने असतात.

पहिला क्वालिफायर - २९ मे २०२५
एलिमिनेटर - ३० मे २०२५

दुसरा क्वालिफायर - १ जून २०२५

फायनल सामना - ३ जून २०२५
Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र