जगातील सर्वात मोठ्या गोवर्धन गोशाळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली : करंजेच्या माळरानावर उभे झालेले नंदनवन म्हणजे कै. तातु सिताराम राणे ट्रस्ट संचलीत गोवर्धन गोशाळा! या गोशाळेचा दिमाखदार शुभारंभ रविवारी ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्रीगण उपस्थित होते.


हिरव्या वनराईने नटलेल्या, निसर्गरम्य करंजे गावात सुमारे ७० एकर जागेत अत्याधुनिक ‘गोशाळा’ उभारण्यात आली आहे. या गोशाळेत गीर, साहीवाल, देवणी, पुंगनूर आदी भारतातील व महाराष्ट्रातील विविध जातींच्या तसेच खिल्लार, स्थानिक कोकण कपिला अशा विविध गायी आहेत. करंजे गावातील गोशाळेत दुधापासून तयार केले जाणारे विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. गोमूत्र वापरुन तयार केलेली ओषधे, खते, गोबरगॅस आणि रंग यांची खरेदी या गोशाळेच्या माध्यमातून लवकरच करता येईल.


करंजेमध्ये गोशाळेसह शेळी - मेंढीपालन, कुक्कुटपालन हे प्रकल्पही लवकरच सुरू केले जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे करंजे तसेच आसपासच्या गावांतील तरुण - तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, खत निर्मिती,दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी विषयावर विविध चर्चासत्रे, अभ्यास शिबीरे, कार्यशाळा घेण्याचेही गोशाळेचे नियोजन आहे. या कार्यक्रमांमध्ये तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.




 
Comments
Add Comment

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी