Virat Kohli: विराट कसोटी क्रिकेटमधून का घेतोय निवृत्ती

  65

मुंबई: काहीच दिवसांपूर्वी भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यापाठोपाठ आता सर्वाच्या गळ्यातील ताईत असलेल्या विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय असं जाहीर केलंय आणि बीसीसीआयला कळवलंय. विराट कोहलीने आताचा हा निर्णय का घेतला ? पाहूयात


विराट कोहली. क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा क्रिकेटपटू. त्याचे असंख्य चाहते आहेत. त्याच्या स्टाईल्स फॉलो करणारे फॅन्सही आहेत. मात्र याच विराट कोहलीने रोहित शर्मापाठोपाठ कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय असं विराटने बीसीसीआयला कळवलंय. मात्र या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती बीसीसीआयने विराट कोहलीला केलीय. विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा अद्याप केलेली नाही, मात्र त्याच्या या निर्णयाने क्रिकेटचाहत्यांमध्ये नाराजी पसरलीय.


कसोटी सामने खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. फलंदाजीत फरफॉर्म दाखवू न शकलेल्या रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतली. हाच निकष विरोट कोहलीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


आपल्या फलंदाजीने समोरच्या गोलंदाजांची पिसे काढणाऱ्या आणि पराभवाचं विजयात रुपांतर करणाऱ्या विराट कोहलीने निवृत्ती घोषणा का केली ते पाहूयात



कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची कारणं 


- बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सुमार फलंदाजी
-बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी
-केवळ पर्थ कसोटीत केलं शतक
-ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 1-3 असा पराभव


धडाकेबाज फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या विराट कोहलीने जून 2011 रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. विराट कोहली पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला.



कसोटी क्रिकेटमधील कामगिरी 


-एकूण 123 कसोटी सामने खेळला
-210 डावांमध्ये 46.85च्या सरासरीने धावा
-30 शतकं आणि 31 अर्ध शतकांचा समावेश


विराट कोहलीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. आता बीसीसीआयने दिलेल्या फेरविचाराच्या प्रस्तावाबाबत विराट कोहली काय निर्णय घेणार याकडे क्रिकेटजगताचं आणि क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.

Comments
Add Comment

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर

IND vs ENG: ज्यो रूट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात मैदानातच जोरदार बाचाबाची!

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील आज दुसऱ्या दिवशीओव्हल क्रिकेट मैदानावर एक मोठा

केनिंग्टन ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 'एवढ्या' धावांत आटोपला

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये