मुंबईत दोन कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने विदेशातून विमानाने तस्करी करुन शहरात आणलेला सुमारे दोन कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा (वीड) जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी ३७ वर्षांच्या वीरू ठाकूर याला अटक केली आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाला अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात हायड्रोपोनिक गांजाची मोठी खेप उतरल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांनी विदेशी गांजाची तस्करी करणाऱ्या वीरू ठाकूर याला अटक केली. त्याच्याकडे सुमारे दोन किलो गांजाचा साठा सापडला. हा साठा बँकॉक, मलेशिया, थायलंड या देशातून आलेल्या प्रवाशांमार्फत तस्करी करुन भारतात आणला होता. प्रवाशांनी सामानात लपवून प्रामुख्याने कॉर्नफ्लेक्सच्या डब्यांमध्ये दडवून गांजा विमानातून मुंबईत आणला होता.


वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, ओशिवरा या भागातील श्रीमंत, उद्योगपती, व्यावसायिकांची तरुण मुले, बॉलीवूडमध्ये कार्यरत मंडळी यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा गांजा मुंबईत आणण्यात आला होता. वीरू ठाकूरच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती समोर येताच भरपूर माहिती उघड होण्याची शक्यता आहे.


हायड्रोपोनिक गांजा


हायड्रोपोनिक गांजा हा उच्च प्रतीचा गांजा आहे. इतर प्रकारांपेक्षा हा गांजा तुलनेने महाग असल्याने श्रीमंत, उच्चभ्रू वर्गामध्ये याला मागणी आहे. विदेशातून तस्करी करुन मुंबईत हा गांजा आणण्यासाठी मोठी साखळी कार्यरत असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. यामुळे तस्करी करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेची माहिती मिळवून कारवाई करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच