जगप्रसिद्ध साई मंदिरात हार, फुल, प्रसाद बंदीचा निर्णय : गोरक्ष गाडीलकर

कृष्णा पॉल (एपिडी, शिर्डी विमानतळ )


शिर्डी : भारत पाकिस्तान युद्धजन्य परी स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साई संस्थान प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून रविवार दि.११ में २०२५ पासून जगप्रसिद्ध साई समाधी मंदिरात फुलहार, प्रसाद नेण्यास मनाई असणार आहे.या निर्णयाची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.


दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सुरक्षितेतच्या दृष्टीने शिर्डीत साई संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.याप्रसंगी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अतिरिक्त पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पी.आय प्रदीप देशमुख आधीच संस्थांचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.यावेळी साई मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिर्डीत देश-विदेशात दररोज हजारो भक्त साई समाधीच्या दर्शनासाठी येतात, फुलहार आणि प्रसाद साई समाधीवर चढवतात, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना फुलहार आणि प्रसाद साई समाधी मंदिरात नेण्यास आता मनाईचा असणार आहे. तसा निर्णय पुढील आदेशापर्यंत घेण्यात आला आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साई संस्थानला धमकीचा मेल देखील प्राप्त झाला आहे. या अगोदर अनेकदा धमकीचे पत्र देखील साई संस्थानला मिळाले आहेत. परंतु यावेळची परिस्थिती वेगळी आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाची परिस्थिती आणी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट मोड'वर ठेवण्यात आली आहे.पवित्र सुवर्ण मंदिर असलेल्या अमृतसर शहरावर पाकिस्तानने ड्रोनचा हल्ला चढवला होता.भारतीय लष्कराने हा हल्ला निष्फळ केला. परंतु या हल्ल्यांमुळे पाकिस्तान भारतातील धार्मिक स्थळ टार्गेट करत असल्याचे निश्चित झाले.यामुळे भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच, युद्धजन्य स्थितीमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षितेतचा वाढ करून त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सुरक्षिततेचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला कडक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जागतिक किर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थानने हार, फुल, प्रसाद बंदीचा मोठा निर्णय घेतला आहे.



साई मंदिर सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतला आढावा भारत पाक युद्ध परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर केंद्र आणी राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतरराष्ट्रीय साईबाबा विमानतळावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. शिर्डी विमानतळवरून नियमित येणाऱ्या जाणाऱ्या प्लाईट सुरु ठेवण्यात आल्या असून यामध्ये अद्यापतरी कोणताही बदल केला नाही.

Comments
Add Comment

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ

क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक