जगप्रसिद्ध साई मंदिरात हार, फुल, प्रसाद बंदीचा निर्णय : गोरक्ष गाडीलकर

कृष्णा पॉल (एपिडी, शिर्डी विमानतळ )


शिर्डी : भारत पाकिस्तान युद्धजन्य परी स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साई संस्थान प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून रविवार दि.११ में २०२५ पासून जगप्रसिद्ध साई समाधी मंदिरात फुलहार, प्रसाद नेण्यास मनाई असणार आहे.या निर्णयाची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.


दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सुरक्षितेतच्या दृष्टीने शिर्डीत साई संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.याप्रसंगी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अतिरिक्त पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पी.आय प्रदीप देशमुख आधीच संस्थांचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.यावेळी साई मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिर्डीत देश-विदेशात दररोज हजारो भक्त साई समाधीच्या दर्शनासाठी येतात, फुलहार आणि प्रसाद साई समाधीवर चढवतात, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना फुलहार आणि प्रसाद साई समाधी मंदिरात नेण्यास आता मनाईचा असणार आहे. तसा निर्णय पुढील आदेशापर्यंत घेण्यात आला आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साई संस्थानला धमकीचा मेल देखील प्राप्त झाला आहे. या अगोदर अनेकदा धमकीचे पत्र देखील साई संस्थानला मिळाले आहेत. परंतु यावेळची परिस्थिती वेगळी आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाची परिस्थिती आणी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट मोड'वर ठेवण्यात आली आहे.पवित्र सुवर्ण मंदिर असलेल्या अमृतसर शहरावर पाकिस्तानने ड्रोनचा हल्ला चढवला होता.भारतीय लष्कराने हा हल्ला निष्फळ केला. परंतु या हल्ल्यांमुळे पाकिस्तान भारतातील धार्मिक स्थळ टार्गेट करत असल्याचे निश्चित झाले.यामुळे भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच, युद्धजन्य स्थितीमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षितेतचा वाढ करून त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सुरक्षिततेचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला कडक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जागतिक किर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थानने हार, फुल, प्रसाद बंदीचा मोठा निर्णय घेतला आहे.



साई मंदिर सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतला आढावा भारत पाक युद्ध परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर केंद्र आणी राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतरराष्ट्रीय साईबाबा विमानतळावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. शिर्डी विमानतळवरून नियमित येणाऱ्या जाणाऱ्या प्लाईट सुरु ठेवण्यात आल्या असून यामध्ये अद्यापतरी कोणताही बदल केला नाही.

Comments
Add Comment

Udya Samant : शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहरांमध्ये ‘मराठी भाषा विकास केंद्र

आगामी एका महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र भाषा अधिकारी - मंत्री उदय सामंत मुंबई: हिंदूहृदयसम्राट

Royalty Free for Farmers : शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, बैलगाड्या अडवल्यास आता पोलिसांवरच कारवाई

- शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द; विहीर, गोठ्यासाठी गौण खनिज मोफत मुंबई : बळीराजाला स्वतःच्या शेती

Ketan Agrawal Murder Case: धक्कादायक! केतनला ढकलण्यासाठी सियाने केला होता सराव; पोलिसांच्या हाती लागले सर्वात मोठे पुरावे!

सिया गोयलच्या घरी पोलिसांचा पंचनामा, घटनेतील कपडे जप्त पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder Case)

Dr. Pankaj Bhoyar : खाजगी, सीबीएसई शाळांच्या मनमानीला बसणार चाप

मुजोर शाळांवर कडक कारवाई करण्यासाठी 'नोडल ऑफिसर्स'ची नियुक्ती - मंत्री डॉ. पंकज भोयर मुंबई : खाजगी, सीबीएसई आणि

Government Scheme : अपघातानंतर आर्थिक संकट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार

१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर मुंबई : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर आक्षेपार्ह पोस्ट; महिला डॉक्टर ५ वर्षांसाठी निलंबित

पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी