‘गोराई कांदळवन उद्याना’ची सफर लांबणीवर

  51

नागरिकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार


मुंबई : सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या ‘गोराई कांदळवन उद्याना’चे लोकार्पण मे महिन्यात करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, उद्यानातील काही कामे शिल्लक असून ही कामे पूर्ण व्हायला काही अवधी लागणार आहे. त्यामुळे गोराईतील कांदळवन सफरीसाफी नागरिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.


गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन उद्यान विकसित करण्यात येत आहे. हे उद्यान गोराई जेट्टीजवळ असून या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कांदळवन उद्यानात पर्यटकांना सुमारे ७०० मीटर लांबीच्या मार्गावरून सफर घडणार आहे. दरम्यान, उद्यानाचे काम पूर्ण झाले आहे. काही छोटी-मोठी कामे शिल्लक आहेत. या उद्यानाची नेमकी किती कामे शिल्लक आहेत हे १५ मेपर्यंत स्पष्ट होईल. त्यानुसार उद्यानाच्या लोकार्पणाबाबत निर्णय घेण्यात येईल. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात या उद्याने लोकार्पण करण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.



बोर्डवॉकवरून कांदळवन न्याहाळता येणार : लाकडाचा वापर करून बोर्डवॉक तयार करण्यात आला आहे. या बोर्डवॉकवरून पर्यटकांना कांदळवन न्याहाळता येणार आहे. पर्यटकांसाठी बोर्डवॉकवर विविध ठिकाणी आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. एकही झाड न तोडता, निसर्गाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने कांदळवन उद्यानाची संरचना तयार करण्यात आली आहे. या उद्यानाला भेट देणाऱ्यांना मुंबईतील कांदळवन परिसंस्थेचे महत्त्व, कांदळवनामुळे मानवाला होणारे फायदे समजू शकतील. त्याचबरोबर कांदळवनाच्या संवर्धनाची आवश्यकता आणि संवर्धनासाठी उपाय कोणते? याची माहितीही मिळू शकणार आहे.


७०० मीटर लांबीचा उन्नत मार्ग : सिंगापूर, अबूदाबी, थायलंडच्या धर्तीवर गोराईमध्ये उन्नत मार्ग साकारण्यात आला आहे. हा मार्ग लाकडी असून त्याची लांबी ७०० मीटर आणि रुंदी २.४ मीटर आहे. तसेच या मार्गात जागोजागी विश्रांतीस्थळ आणि माहितीस्थळ आहेत. हा उन्नत मार्ग तयार करताना कोणत्याही वनस्पतीला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. गोराई कांदळवन उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून काही छोटी-मोठी कामे शिल्लक आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis on Meat Ban: स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा निर्णय राज्य सरकारचा नाहीच! मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

ज्याला जे खायचं ते खात आहेत. आपल्या देशात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे मुंबई: राज्यातील अनेक महापालिकांनी १५

मुंबई गणेशोत्सवासाठी सज्ज, चौपाटीवर विसर्जनाची तयारी!

मुंबई : गणेश चतुर्थीच्या आगमनामुळे मुंबईत जोरदार तयारी सुरू झाली आहे, विशेषतः गिरगाव चौपाटीवर, जे विसर्जनाचे एक

Dadar Kabutar Khana : "महापालिका निर्णय बदलणार नाही" माणसाचे आरोग्य सर्वोपरि, काय म्हणाले बीएमसीचे वकील ?

कबुतरखाना प्रकरणात बीएमसीचे स्पष्ट विधान मुंबई : दादर कबूतरखाना प्रकरणात सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत,

Dahi Handi 2025 : ढाक्कुमाकुम… ढाक्कुमाकुम! मुंबई-ठाण्यात गोविंदांचा जल्लोष, यंदा कुठे मिळणार विक्रमी बक्षीस? जाणून घ्या A टू Z माहिती

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि जल्लोषाचा अनोखा माहोल निर्माण करणाऱ्या दहीहंडी उत्सवाला

Dadar Kabutar Khana : जैन लोकांनी आंदोलन केलं ते चाललं, आम्हाला मात्र ताब्यात घेतलं, हा दुजाभाव का?

मराठा एकीकरण समितीचा सवाल मुंबई : दादर कबुतरखाना परिसरात घडलेल्या ६ ऑगस्टच्या घटनेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर

Kabutar Khana : "शस्त्र उचलणार असाल तर"...दादर कबुतरखाना प्रकरणात मराठी एकीकरण समितीचा आक्रमक पवित्रा

मुंबई : हायकोर्टाच्या आदेशानुसार दादर येथील कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध म्हणून मागील