भारत - पाकिस्तान शस्त्रसंधी करुन चर्चा करणार

वॉशिंग्टन डी. सी. : भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करुन चर्चेची तयारी दाखवली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ या अमेरिकेतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा दावा केला आहे. सलग अनेक तास केलेल्या चर्चेअंती तोडगा काढण्यात यशस्वी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.




याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २६ नागरिकांची नाव आणि धर्म विचारुन हत्या केली. मृतांमध्ये २५ भारतीय आणि एक नेपाळी होता. यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर केले आणि पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात ७ ते १० मे दरम्यान प्रत्येक रात्री संघर्ष सुरू होता. यानंतर १० मे रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी होत असल्याचा दावा केला. शस्त्रसंधी होत असल्याचे पाकिस्तानकडूनही जाहीर करण्यात आले. भारताने शस्त्रसंधीचा प्रस्ताव आला असून चर्चा करणार असल्याचे सांगितले.


पाकिस्तानच्या डीजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सने भारताच्या डीजीएमओंना फोन करुन चर्चेसाठी आमंत्रित केले. तसेच जमीन, आकाश आणि पाणी अशा सर्वच ठिकाणी शस्त्रसंधी करत असल्याचे पाकिस्तानच्या डीजीएमओने जाहीर केले. यानंतर पाकिस्तान हल्ला करणार नसेल तर भारत प्रत्युत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही, असे भारताकडून सांगण्यात आले. लष्करी संकेतानुसार पाकिस्तानच्या डीजीएमओकडून आलेले चर्चेचे आमंत्रण भारताच्या डीजीएमओने स्वीकारले आहे. चर्चा कोणत्या मुद्यांवर होणार, कोणत्या अटी - शर्तींच्या आधारे होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. जर डीजीएमओ पातळीवरील चर्चा यशस्वी झाली तर सीमेवर शांतता नांदेल पण चर्चा अयशस्वी झाल्यास काय होणा या प्रश्नाचे उत्तर १२ मे रोजी होणार असलेल्या चर्चेअंती मिळेल.





सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगितच राहणार ?


सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित राहणार की पुन्हा पूर्ववत केला जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. भारत सरकारने या संदर्भात कोणतीही नवी घोषणा केलेली नाही. यामुळे सध्या तरी कागदोपत्री सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगितच आहे.

Comments
Add Comment

Dharmendra Pradhan on NEET : NEET विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: पुर्नपरीक्षेसाठी शुल्क नाही, जुनी फी परत मिळणार! : धर्मेंद प्रधान

नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या NEET-UG 2026 परीक्षेच्या

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या