India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

  76

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील भागांमध्ये ड्रोन आणि मिसाईलच्या सहाय्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम S 400ने या हल्ल्यांना अतिशय प्रभावीपणे इंटरसेप्ट करत निष्फळ केले. याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने कराची पोर्टला लक्ष्य केले आणि त्यांचे एक अमेरिकी एफ १६, दोन चीनी जेएफ १७ फायटर जेटसह रडार आणि डिफेन्स सिस्टीमला नेस्तनाबूत केले. यातच अमेरिका आणि तुर्कीची प्रतिक्रिया आली आहे.


अमेरिकेचे उप राष्ट्रपती जे डी वान्स यांनी वाढत्या तणावावर म्हटले आहे की, अमेरिका इच्छा असूनही या युद्धात सरळ हस्तक्षेप करणार नाही. त्यांच्या ते भारत आणि पाकिस्तान दोघांनाही हत्यारे टाकण्यास सांगणे सोपे नाही. अमेरिका राजकीय मार्गाने स्थिती बिघडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामते हा तणाव एका मोठ्या क्षेत्रीय युद्ध अथवा परमाणु संघर्षामध्ये रूपांतरित होणार नाही.



काय म्हणाले उपराष्ट्रपती जेडी वेन्स?


जेडी वेन्स म्हणाले, तुम्हाला माहीत आहे, अमेरिका भारतीयांना हत्यारे टाकण्यास सांगू शकत नाही. तसेच पाकिस्तानलाही आम्ही हे सांगू शकत नाही. यासाठी आम्ही राजकीय मार्गाने हे प्रकरण पुढे नेत आहोत. आम्हाला आशा आहे की हा तणाव एखाद्या क्षेत्रीय युद्ध, देव न करो अणुयुद्धामध्ये रूपांतरित न होवो. सध्या असे काही होणार नाही.



तुर्कीच्या राष्ट्रपतींनी दिली प्रतिक्रिया


दुसरीकडे तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन यांनी या परिस्थितीवर आपली चिंता जाहीर केली. त्यांनी पाकिस्तानात मारल्या गेलेल्या लोकांना शहीद म्हटले आहे. ते म्हणाले, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव मिसाईल हल्ल्यांसह खुल्या युद्धात रूपांतरित होऊ शकतो. यात अनेक नागरिक शहीद झाले.

Comments
Add Comment

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली

देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक