India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील भागांमध्ये ड्रोन आणि मिसाईलच्या सहाय्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम S 400ने या हल्ल्यांना अतिशय प्रभावीपणे इंटरसेप्ट करत निष्फळ केले. याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने कराची पोर्टला लक्ष्य केले आणि त्यांचे एक अमेरिकी एफ १६, दोन चीनी जेएफ १७ फायटर जेटसह रडार आणि डिफेन्स सिस्टीमला नेस्तनाबूत केले. यातच अमेरिका आणि तुर्कीची प्रतिक्रिया आली आहे.


अमेरिकेचे उप राष्ट्रपती जे डी वान्स यांनी वाढत्या तणावावर म्हटले आहे की, अमेरिका इच्छा असूनही या युद्धात सरळ हस्तक्षेप करणार नाही. त्यांच्या ते भारत आणि पाकिस्तान दोघांनाही हत्यारे टाकण्यास सांगणे सोपे नाही. अमेरिका राजकीय मार्गाने स्थिती बिघडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामते हा तणाव एका मोठ्या क्षेत्रीय युद्ध अथवा परमाणु संघर्षामध्ये रूपांतरित होणार नाही.



काय म्हणाले उपराष्ट्रपती जेडी वेन्स?


जेडी वेन्स म्हणाले, तुम्हाला माहीत आहे, अमेरिका भारतीयांना हत्यारे टाकण्यास सांगू शकत नाही. तसेच पाकिस्तानलाही आम्ही हे सांगू शकत नाही. यासाठी आम्ही राजकीय मार्गाने हे प्रकरण पुढे नेत आहोत. आम्हाला आशा आहे की हा तणाव एखाद्या क्षेत्रीय युद्ध, देव न करो अणुयुद्धामध्ये रूपांतरित न होवो. सध्या असे काही होणार नाही.



तुर्कीच्या राष्ट्रपतींनी दिली प्रतिक्रिया


दुसरीकडे तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन यांनी या परिस्थितीवर आपली चिंता जाहीर केली. त्यांनी पाकिस्तानात मारल्या गेलेल्या लोकांना शहीद म्हटले आहे. ते म्हणाले, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव मिसाईल हल्ल्यांसह खुल्या युद्धात रूपांतरित होऊ शकतो. यात अनेक नागरिक शहीद झाले.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या