India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

  57

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील भागांमध्ये ड्रोन आणि मिसाईलच्या सहाय्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम S 400ने या हल्ल्यांना अतिशय प्रभावीपणे इंटरसेप्ट करत निष्फळ केले. याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने कराची पोर्टला लक्ष्य केले आणि त्यांचे एक अमेरिकी एफ १६, दोन चीनी जेएफ १७ फायटर जेटसह रडार आणि डिफेन्स सिस्टीमला नेस्तनाबूत केले. यातच अमेरिका आणि तुर्कीची प्रतिक्रिया आली आहे.


अमेरिकेचे उप राष्ट्रपती जे डी वान्स यांनी वाढत्या तणावावर म्हटले आहे की, अमेरिका इच्छा असूनही या युद्धात सरळ हस्तक्षेप करणार नाही. त्यांच्या ते भारत आणि पाकिस्तान दोघांनाही हत्यारे टाकण्यास सांगणे सोपे नाही. अमेरिका राजकीय मार्गाने स्थिती बिघडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामते हा तणाव एका मोठ्या क्षेत्रीय युद्ध अथवा परमाणु संघर्षामध्ये रूपांतरित होणार नाही.



काय म्हणाले उपराष्ट्रपती जेडी वेन्स?


जेडी वेन्स म्हणाले, तुम्हाला माहीत आहे, अमेरिका भारतीयांना हत्यारे टाकण्यास सांगू शकत नाही. तसेच पाकिस्तानलाही आम्ही हे सांगू शकत नाही. यासाठी आम्ही राजकीय मार्गाने हे प्रकरण पुढे नेत आहोत. आम्हाला आशा आहे की हा तणाव एखाद्या क्षेत्रीय युद्ध, देव न करो अणुयुद्धामध्ये रूपांतरित न होवो. सध्या असे काही होणार नाही.



तुर्कीच्या राष्ट्रपतींनी दिली प्रतिक्रिया


दुसरीकडे तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन यांनी या परिस्थितीवर आपली चिंता जाहीर केली. त्यांनी पाकिस्तानात मारल्या गेलेल्या लोकांना शहीद म्हटले आहे. ते म्हणाले, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव मिसाईल हल्ल्यांसह खुल्या युद्धात रूपांतरित होऊ शकतो. यात अनेक नागरिक शहीद झाले.

Comments
Add Comment

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar) 

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार, तीन दलित मुलांना खांबाला बांधून बेदम चोपले

गडग : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील गडग

आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी