India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले


पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून नाचक्की होऊ लागल्याने पाकिस्तानने जम्मू - काश्मीरमध्ये हल्ले करायला सुरुवात केली, मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आणि सर्व कट धुळीस मिळवले आहेत. भारताने पाकिस्तानला जशास तसं कसं उत्तर दिलंय ते पाहूया...


?si=cjkAeAJDmm1eC6dR

काही भागात ब्लॅक आऊट


पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले भारताने परतवले आहेत. पाकिस्तानचे हल्ले भारताच्या एस ४०० सिस्टिमने परतवून लावले. भारताने पाकिस्तानला करारी जबाब दिलाय. पाकिस्तान हल्ला करणार याच्या शक्यता असल्याने जम्मू विमानतळावर ब्लॅक आऊट करण्यात आलं. इतकंच नव्हे तर काश्मीरचा काही भाग, श्रीनगर विमानतळ, राजस्तानमधील पोखरण आणि गुजरातमधील काही भागात ब्लॅक आऊट करण्यात आला आहे.


पाकिस्तानने ड्रोन, मिसाईलद्वारे जम्मू-काश्मीरमधील काही भागात हल्ले केले. मात्र भारताच्या हे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. जम्मू विद्यापीठाजवळ पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडण्यात आले. काश्मीरच्या राजौरीमध्य़े धमाका झाला आहे. त्याचबरोबर श्रीनगर हायवेवरही तीन ते चार मोठे स्फोट झाले आहेत.



इस्लामाबादवर हल्ला


भारताने पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही उदध्वस्त केली. एस ४०० सिस्टिमने पाकिस्तानंची दोन जेएफ - १७ आणि एफ १६ ही लढावू विमानं पाडली. पाकिस्तानने राजस्थानमध्ये ३० पेक्षा जास्त मिसाईल डागली, मात्र भारताने ही सर्व क्षेपणास्त्र नष्ट केली आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने लाहोरवर ड्रोन हल्ला केलाय. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिमही भारताने निष्क्रिय केलीय. जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या SWARM सिस्टिमचा हल्ला भारताने हाणून पाडलाय. भारतीय सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले आहेत. भारताने लाहोरपाठोपाठ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला केलाय. भारतीय सेनेच्या या धाडसी कार्याला सॅल्यूट....

Comments
Add Comment

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे घातपात!

- रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय; पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलवर सही करण्यास उशीर झाल्याने करावा लागला

EPFO 3.0 : नोकरदारांसाठी मोठी बातमी : आता पीएफचे पैसे मिळतील एका क्लिकवर, 'ही' आहे महत्त्वाची तारीख!

नवी दिल्ली : देशातील सुमारे ८ कोटी नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी