India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले


पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून नाचक्की होऊ लागल्याने पाकिस्तानने जम्मू - काश्मीरमध्ये हल्ले करायला सुरुवात केली, मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आणि सर्व कट धुळीस मिळवले आहेत. भारताने पाकिस्तानला जशास तसं कसं उत्तर दिलंय ते पाहूया...


?si=cjkAeAJDmm1eC6dR

काही भागात ब्लॅक आऊट


पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले भारताने परतवले आहेत. पाकिस्तानचे हल्ले भारताच्या एस ४०० सिस्टिमने परतवून लावले. भारताने पाकिस्तानला करारी जबाब दिलाय. पाकिस्तान हल्ला करणार याच्या शक्यता असल्याने जम्मू विमानतळावर ब्लॅक आऊट करण्यात आलं. इतकंच नव्हे तर काश्मीरचा काही भाग, श्रीनगर विमानतळ, राजस्तानमधील पोखरण आणि गुजरातमधील काही भागात ब्लॅक आऊट करण्यात आला आहे.


पाकिस्तानने ड्रोन, मिसाईलद्वारे जम्मू-काश्मीरमधील काही भागात हल्ले केले. मात्र भारताच्या हे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. जम्मू विद्यापीठाजवळ पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडण्यात आले. काश्मीरच्या राजौरीमध्य़े धमाका झाला आहे. त्याचबरोबर श्रीनगर हायवेवरही तीन ते चार मोठे स्फोट झाले आहेत.



इस्लामाबादवर हल्ला


भारताने पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही उदध्वस्त केली. एस ४०० सिस्टिमने पाकिस्तानंची दोन जेएफ - १७ आणि एफ १६ ही लढावू विमानं पाडली. पाकिस्तानने राजस्थानमध्ये ३० पेक्षा जास्त मिसाईल डागली, मात्र भारताने ही सर्व क्षेपणास्त्र नष्ट केली आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने लाहोरवर ड्रोन हल्ला केलाय. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिमही भारताने निष्क्रिय केलीय. जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या SWARM सिस्टिमचा हल्ला भारताने हाणून पाडलाय. भारतीय सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले आहेत. भारताने लाहोरपाठोपाठ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला केलाय. भारतीय सेनेच्या या धाडसी कार्याला सॅल्यूट....

Comments
Add Comment

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :

Indian Army : यावर्षी कर्तव्य पथावर दिसणार हे 'सहा शस्त्र' जी पाकिस्तानसह कोणत्याही शत्रूला भरवतील धडकी

नवी दिल्ली : भारताच्या कर्तव्य पाथ (प्रजासत्ताक दिन परेड) मध्ये यंदा देशाच्या संरक्षण आणि सामर्थ्याचे प्रदर्शन

भारतावर पुन्हा होणार दहशवादी हल्ला ? व्हायरल झालेल्या व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

कराची : सोशल मीडियावर पाकिस्तानातून भारताला उद्देशून केलेले धमकीचे व्हिडीओ नवे नाहीत. मात्र सध्या व्हायरल होत

मोकाट कुत्र्यांचा हल्ला; मुरादाबादमध्ये चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू, परिसर हादरला

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याने एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चार

Nitin Nabin : "नितीन नवीन आता माझेही बॉस!"; भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदींचे भावूक उद्गार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा नितीन नवीन यांनी स्वीकारल्यानंतर आयोजित