India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

  58

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले


पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून नाचक्की होऊ लागल्याने पाकिस्तानने जम्मू - काश्मीरमध्ये हल्ले करायला सुरुवात केली, मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आणि सर्व कट धुळीस मिळवले आहेत. भारताने पाकिस्तानला जशास तसं कसं उत्तर दिलंय ते पाहूया...


?si=cjkAeAJDmm1eC6dR

काही भागात ब्लॅक आऊट


पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले भारताने परतवले आहेत. पाकिस्तानचे हल्ले भारताच्या एस ४०० सिस्टिमने परतवून लावले. भारताने पाकिस्तानला करारी जबाब दिलाय. पाकिस्तान हल्ला करणार याच्या शक्यता असल्याने जम्मू विमानतळावर ब्लॅक आऊट करण्यात आलं. इतकंच नव्हे तर काश्मीरचा काही भाग, श्रीनगर विमानतळ, राजस्तानमधील पोखरण आणि गुजरातमधील काही भागात ब्लॅक आऊट करण्यात आला आहे.


पाकिस्तानने ड्रोन, मिसाईलद्वारे जम्मू-काश्मीरमधील काही भागात हल्ले केले. मात्र भारताच्या हे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. जम्मू विद्यापीठाजवळ पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडण्यात आले. काश्मीरच्या राजौरीमध्य़े धमाका झाला आहे. त्याचबरोबर श्रीनगर हायवेवरही तीन ते चार मोठे स्फोट झाले आहेत.



इस्लामाबादवर हल्ला


भारताने पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही उदध्वस्त केली. एस ४०० सिस्टिमने पाकिस्तानंची दोन जेएफ - १७ आणि एफ १६ ही लढावू विमानं पाडली. पाकिस्तानने राजस्थानमध्ये ३० पेक्षा जास्त मिसाईल डागली, मात्र भारताने ही सर्व क्षेपणास्त्र नष्ट केली आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने लाहोरवर ड्रोन हल्ला केलाय. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिमही भारताने निष्क्रिय केलीय. जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या SWARM सिस्टिमचा हल्ला भारताने हाणून पाडलाय. भारतीय सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले आहेत. भारताने लाहोरपाठोपाठ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला केलाय. भारतीय सेनेच्या या धाडसी कार्याला सॅल्यूट....

Comments
Add Comment

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली