India Pakistan Tension: उरीमध्ये पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार, पंतप्रधान मोदींची तीन्ही सैन्याध्यक्षांसह बैठक

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून सीमेपार पुन्हा एकदा जोरदार गोळीबार सुरू झाला आहे. उरी सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे. येथे पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार केला जात आहे.


भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी तीनही सैन्याध्यक्षांसोबत महत्त्वाची बैठक घेतली जात आहे. या बैठकीत नौदल प्रमुख, हवाईदल प्रमुख आणि लष्कर प्रमुखांसोबत सीडीएसही उपस्थित आहेत. थोड्या वेळाआधी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या महत्त्वाच्या बैठकीत एनएसए अजित डोवाल यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही बैठकीत सामील होण्यासाठी थोड्या वेळाआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.



पाकिस्तानला न डिवचताही त्यांनी ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला - व्योमिका सिंह


विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रात्री साडेआठ वाजता पाकिस्तानने भारतावर कोणत्याही कारणाशिवाय ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. तसेच यानंतर आपल्या नागरी हवाई क्षेत्र बद केले नाही. पाकिस्तानने मुद्दामहून नागरिक विमानांना ढालच्या रूपात वापरले. त्यांना माहीत होते की त्यांनी हल्ला केल्यानंतर भारताकडून तात्काळ एअर डिफेन्सकडून प्रत्युत्तर मिळेल.

Comments
Add Comment

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.