India Pakistan Tension: उरीमध्ये पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार, पंतप्रधान मोदींची तीन्ही सैन्याध्यक्षांसह बैठक

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून सीमेपार पुन्हा एकदा जोरदार गोळीबार सुरू झाला आहे. उरी सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे. येथे पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार केला जात आहे.


भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी तीनही सैन्याध्यक्षांसोबत महत्त्वाची बैठक घेतली जात आहे. या बैठकीत नौदल प्रमुख, हवाईदल प्रमुख आणि लष्कर प्रमुखांसोबत सीडीएसही उपस्थित आहेत. थोड्या वेळाआधी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या महत्त्वाच्या बैठकीत एनएसए अजित डोवाल यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही बैठकीत सामील होण्यासाठी थोड्या वेळाआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.



पाकिस्तानला न डिवचताही त्यांनी ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला - व्योमिका सिंह


विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रात्री साडेआठ वाजता पाकिस्तानने भारतावर कोणत्याही कारणाशिवाय ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. तसेच यानंतर आपल्या नागरी हवाई क्षेत्र बद केले नाही. पाकिस्तानने मुद्दामहून नागरिक विमानांना ढालच्या रूपात वापरले. त्यांना माहीत होते की त्यांनी हल्ला केल्यानंतर भारताकडून तात्काळ एअर डिफेन्सकडून प्रत्युत्तर मिळेल.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे