India Pakistan Tension: उरीमध्ये पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार, पंतप्रधान मोदींची तीन्ही सैन्याध्यक्षांसह बैठक

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून सीमेपार पुन्हा एकदा जोरदार गोळीबार सुरू झाला आहे. उरी सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे. येथे पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार केला जात आहे.


भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी तीनही सैन्याध्यक्षांसोबत महत्त्वाची बैठक घेतली जात आहे. या बैठकीत नौदल प्रमुख, हवाईदल प्रमुख आणि लष्कर प्रमुखांसोबत सीडीएसही उपस्थित आहेत. थोड्या वेळाआधी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या महत्त्वाच्या बैठकीत एनएसए अजित डोवाल यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही बैठकीत सामील होण्यासाठी थोड्या वेळाआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.



पाकिस्तानला न डिवचताही त्यांनी ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला - व्योमिका सिंह


विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रात्री साडेआठ वाजता पाकिस्तानने भारतावर कोणत्याही कारणाशिवाय ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. तसेच यानंतर आपल्या नागरी हवाई क्षेत्र बद केले नाही. पाकिस्तानने मुद्दामहून नागरिक विमानांना ढालच्या रूपात वापरले. त्यांना माहीत होते की त्यांनी हल्ला केल्यानंतर भारताकडून तात्काळ एअर डिफेन्सकडून प्रत्युत्तर मिळेल.

Comments
Add Comment

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक