भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला निष्फळ ठरवले आहे. भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम सुदर्शनने या हल्ल्यांना परतून लावले. पाकिस्तानच्या हल्ल्याने भारतातील अनेक शहरांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला होता. भारतीय सुरक्षा रक्षकांनी पाकिस्तानच्या अत्याधुनिक विमान F 16 आणि JF 17 पाडले.



पाकिस्तानचे ५० ड्रोन उद्धवस्त


सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या रात्री एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारताच्या अनेक ठिकाणी दणादण अनेक ड्रोन डागण्यात आले. मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून ५० पेक्षा अधिक ड्रोन हवेत मारण्यात आले. L-70 गन, Zu-23mm, शिल्का सिस्टम आणि इतर अॅडव्हान्स हत्यारांनी पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना उद्ध्वस्त केले.


 


जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरू


गेल्या रात्री पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने हल्ला सुरू केला आहे. उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला आहे.



भारतीय लष्कराचे विधान


भारतीय लष्कराने सोशल मिडिया पोस्टमध्ये सांगितले की पाकिस्तानच्या सैन्याने ८ आणि ९ मेच्या दरम्यान रात्री भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करून अनेक हल्ले केले. पाकिस्तानी लष्कराने एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र पाकिस्तानचे हे हल्ले परतून लावले आहे. त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.





Comments
Add Comment

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात

Kanpur Shocker : कानपूरमध्ये SSC-GD परीक्षेचा बोजवारा! एकाच केंद्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची गर्दी; दोन्ही सत्रांतील परीक्षा रद्द

कानपूर : कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) भोंगळ कारभाराचा एक मोठा नमुना कानपूरमध्ये सोमवारी पाहायला मिळाला.