पाक विरोधातील मोहिमेत सैन्याचे मनोबल वाढवा ! मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे याचे जनतेला आवाहन

प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे!


कणकवली : देशात जी युद्धजन्य स्थिती आहे,त्याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जशासतसे उत्तर देत आहे. देशाच्या सैन्यदलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान आहे. आहे. केंद्र सरकारकडून ज्या सूचना,आवाहने केली जात आहेत,त्यांचे पालन आपण नागरिक म्हणून करायला हवे. निष्पाप पर्यटकांना पेहलगाममध्ये अतिरेक्यांनी मारल्यानंतर मोदी सरकारने या अतिरेक्यांविरोधात मोहीम उघडली आहे. अशावेळी सर्वांनी सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.


कणकवली येथील प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे बोलत होते, भारताचे नागरिक म्हणून आपण सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांतून सैन्य दलाचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरूनही सैन्याच्या कारवायांबाबत शंका उपस्थित न करता त्यांचे मनोबल कसे वाढेल असे काम करा. कायद्याच्या चौकटीत राहून तिरंग्याची रॅली काढली जात असल्यास जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, नागरिकांनी रक्तदान शिबिर आयोजित करावीत,भारतीय नौदलाकडून सागरी हद्द आणि मच्छिमारांना ज्या सूचना दिल्या जातील, त्या सर्व मच्छीमारांना पाळाव्यात, संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. अतिउत्साहीपणा न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले.



मी माझ्या मत्स्य व बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. किनारपट्टी भागासाठी केंद्राने दिलेल्या सूचना व आदेश पाळण्यासाठी सहकार्य करावे, कोणीही मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, उत्साहाच्या भरात नियम सोडले जाऊ नये याची काळजी घ्या. प्रशासनालाही मच्छीमारबांधवांपर्यंत सूचना, आदेश पोहचविण्यास सांगण्यात आले आहे, असे श्री, राणे यांनी सांगितले, तिनही दलांचे सुरक्षेच्यादृष्टीने बारकाईने लक्ष आहे. जलदुर्ग व बंदरे सुरक्षिततेच्यादृष्टीने आढावा घेण्यात आला आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास संपर्क साधावा, असेही सांगितले आहे.


मदरशांमधून शिक्षण मिळायला हवे, असा उद्देश आहे. मात्र दोडामार्गला मदरशांमध्ये तलवारी मिळाल्या. त्यामुळे गरज पडली तर सर्च ऑपरेशनही राबवाये लागेल, कुडाळ तालुक्यातील एका मदरशामध्ये बाहेरून फंडिंग होतेय, असे कानावर आले आहे. त्यामुळे मदरशांमधून शिक्षणच मिळायला हवें, यासाठी लक्ष ठेवले जात आहे, असेही राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी