पाक विरोधातील मोहिमेत सैन्याचे मनोबल वाढवा ! मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे याचे जनतेला आवाहन

प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे!


कणकवली : देशात जी युद्धजन्य स्थिती आहे,त्याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जशासतसे उत्तर देत आहे. देशाच्या सैन्यदलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान आहे. आहे. केंद्र सरकारकडून ज्या सूचना,आवाहने केली जात आहेत,त्यांचे पालन आपण नागरिक म्हणून करायला हवे. निष्पाप पर्यटकांना पेहलगाममध्ये अतिरेक्यांनी मारल्यानंतर मोदी सरकारने या अतिरेक्यांविरोधात मोहीम उघडली आहे. अशावेळी सर्वांनी सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.


कणकवली येथील प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे बोलत होते, भारताचे नागरिक म्हणून आपण सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांतून सैन्य दलाचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरूनही सैन्याच्या कारवायांबाबत शंका उपस्थित न करता त्यांचे मनोबल कसे वाढेल असे काम करा. कायद्याच्या चौकटीत राहून तिरंग्याची रॅली काढली जात असल्यास जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, नागरिकांनी रक्तदान शिबिर आयोजित करावीत,भारतीय नौदलाकडून सागरी हद्द आणि मच्छिमारांना ज्या सूचना दिल्या जातील, त्या सर्व मच्छीमारांना पाळाव्यात, संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. अतिउत्साहीपणा न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले.



मी माझ्या मत्स्य व बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. किनारपट्टी भागासाठी केंद्राने दिलेल्या सूचना व आदेश पाळण्यासाठी सहकार्य करावे, कोणीही मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, उत्साहाच्या भरात नियम सोडले जाऊ नये याची काळजी घ्या. प्रशासनालाही मच्छीमारबांधवांपर्यंत सूचना, आदेश पोहचविण्यास सांगण्यात आले आहे, असे श्री, राणे यांनी सांगितले, तिनही दलांचे सुरक्षेच्यादृष्टीने बारकाईने लक्ष आहे. जलदुर्ग व बंदरे सुरक्षिततेच्यादृष्टीने आढावा घेण्यात आला आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास संपर्क साधावा, असेही सांगितले आहे.


मदरशांमधून शिक्षण मिळायला हवे, असा उद्देश आहे. मात्र दोडामार्गला मदरशांमध्ये तलवारी मिळाल्या. त्यामुळे गरज पडली तर सर्च ऑपरेशनही राबवाये लागेल, कुडाळ तालुक्यातील एका मदरशामध्ये बाहेरून फंडिंग होतेय, असे कानावर आले आहे. त्यामुळे मदरशांमधून शिक्षणच मिळायला हवें, यासाठी लक्ष ठेवले जात आहे, असेही राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत