भारत - पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील २४ विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद केले आहे. या विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक बंद आहे. तसेच भारत सरकारने दिल्ली, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये हाय अलर्ट दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही हाय अलर्ट देण्यात आला आहे.


पाकिस्तानने भारतातील सैन्य आस्थापने आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करुन हल्ले केले. पाकिस्तानचे सर्व हवाई हल्ले भारताने परतवले. पाकिस्तानने सीमेजवळच्या गावांना तसेच सीमेवरील सुरक्षा पथकांच्या चौकी - पहाऱ्यांना लक्ष्य करुन गोळीबार आणि जड तोफांचा मारा केला. या हल्ल्यांना उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील सैन्य आस्थापनांवर हल्ले केले आहेत. तसेच भारताने कराची बंदरालाही लक्ष्य केले आहे.


भारतात प्रामुख्याने उत्तर आणि पश्चिम भागातील नागरी विमान वाहतूक बंद आहे. जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब येथे शाळा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत.


भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू असल्यामुळे नागरी विमान वाहतुकीवर सध्या प्रतिकूल परिणाम झाला आहे. नागरिकांना विमानाच्या नियोजीत वेळेच्या किमान सव्वा ते दीड तास आधी विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन नागरी विमान वाहतूक कंपन्यांनी केले आहे.


भारत - पाकिस्तान लढाई


पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी भारतात पहलगाम येथे हल्ला केला आणि २५ भारतीय तसेच एका नेपाळी नागरिकाची हत्या केली. यानंतर भारताने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळांवर कारवाई केली. पण अतिरेक्यांचा जोडीदार असलेल्या पाकिस्तानचा संताप झाला. त्यांनी लगेच ७ मे रोजी रात्री आणि ८ मे रोजी मध्यरात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील निवडक शहरांवर मोजक्या ड्रोनच्या मदतीने हल्ला केला. ही कारवाई कमालीची यशस्वी झाली. ड्रोन हल्ल्यामुळे भडकलेल्या पाकिस्तानने ८ मे रोजी रात्रीपासूनच भारतावर हल्ले करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानने नागरी वस्ती आणि सैन्याची आस्थापने या दोन्हीला लक्ष्य करुन हवाई हल्ले सुरू केले. तसेच सीमेवर गोळीबार आणि जड तोफांचा मारा सुरू केला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने प्रचंड वेगाने आणि अतिशय प्रभावी उत्तर दिले. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना आकाशातच नष्ट केल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी तीव्र हल्ले केले. पाकिस्तानच्या सर्व विमानतळांना आणि सैन्याच्या आस्थापनांना लक्ष्य करुन हल्ले करायला सुरुवात झाली. या कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन, लहान - मोठी क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, अॅवॅक्स रडार नष्ट केले. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या कराची बंदरात आणि अनेक विमानतळांवर सतत स्फोट होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही परिस्थिती सकाळ उजाडली तरी कायम आहे.

Comments
Add Comment

Snake Bite Death Odisha : ओडिशा हादरले: सर्पदंशाने आठ महिन्यांच्या गरोदर महिलेचा करुण अंत; रुग्णालयात जमावाचा राडा आणि डॉक्टरांना अमानुष मारहाण

मलकानगिरी : ओडिशा राज्यातील मलकानगिरी (Malkanagri) जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली

NASA Astronaut Anil Menon : भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर अनिल मेनन आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज; सुमारे आठ महिन्यांहून अधिक काळ राहणार अंतराळात

- १४ जुलैला होणार ऐतिहासिक प्रक्षेपण नवी दिल्ली : भारतीय वंशाचे चिकित्सक आणि नासाचे अंतराळवीर अनिल मेनन (Anil Menon) आता

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता मिळणार की अडकणार? त्वरित करा 'हे' ३ काम

- २० जूनला खात्यात येणार २,००० रुपये मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या लाभार्थी

RBI Recruitment 2026 : आरबीआयमध्ये तरुणांना सुवर्णसंधी; दरमहा मिळणार तब्बल १.५ लाखांचा पगार, जाणून घ्या क सा करायचा अर्ज?

मुंबई : देशातील तरुण आणि होतकरू पदवीधरांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक अतिशय सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

Ambubachi Mela 2026 : कामाख्या देवीच्या भक्तांसाठी मोठी बातमी! 'अंबुबाची मेळा २०२६'साठी रेल्वेची खास तयारी

गुवाहाटी : आसाममधील जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक कामाख्या मंदिरात (Kamakhya Temple) दरवर्षी भरणारा पवित्र 'अंबुबाची मेळा' (Ambubachi Mela

Gujarat Tragedy : वडोदरा-हालोल महामार्गावर उभ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू, तर २६ प्रवासी जखमी

वडोदरा : गुजरात राज्याला (Gujrat News) हादरवून सोडणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना बुधवारी पहाटे घडली