लाहोरमध्ये लागोपाठ तीन स्फोट, पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण

लाहोर : भारतीय सैन्याने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर गुरुवार ८ मे रोजी लाहोरमध्ये लागोपाठ तीन स्फोट झाले. या स्फोटांमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने पुन्हा हवाई हल्ला केल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू झाली आहे. स्फोट लाहोरच्या जुन्या विमानतळाच्या जवळ झाले.


लाहोरच्या जुन्या विमानतळाच्या आवारात ड्रोन पडला. यानंतर स्फोटाचा आवाज ऐकू आला, असे एका स्थानिकाने पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. या घटनेनंतर लाहोरमधील विमानवाहतूक तातडीने थांबवण्यात आली आहे. लाहोरमधील वॉल्टन विमानतळ, गोपालनगर आणि नसराबाद या तीन ठिकाणी असे एकूण तीन स्फोट झाल्याचे वृत्त पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर हा दुसरा हल्ला झाल्याचे पाकिस्तानमधील निवडक वृत्तवाहिन्या सांगत आहे. भारताने या स्फोटांबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.


स्फोटांचे आवाज ऐकू येताच लाहोरमध्ये ठिकठिकाणी सायरन वाजू लागले. लोक भराभर सुरक्षित ठिकाण गाठू लागले. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत वॉल्टन विमानतळ परिसरात स्फोटामुळे निर्माण झालेला धूर दिसत आहे. पाकिस्तानमधून आलेल्या ताज्या वृत्तानुसार कराची, लाहोर, सियालकोट येथील विमानवाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही विमानवाहतूक बंद राहणार आहे.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला