लाहोरमध्ये लागोपाठ तीन स्फोट, पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण

लाहोर : भारतीय सैन्याने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर गुरुवार ८ मे रोजी लाहोरमध्ये लागोपाठ तीन स्फोट झाले. या स्फोटांमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने पुन्हा हवाई हल्ला केल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू झाली आहे. स्फोट लाहोरच्या जुन्या विमानतळाच्या जवळ झाले.


लाहोरच्या जुन्या विमानतळाच्या आवारात ड्रोन पडला. यानंतर स्फोटाचा आवाज ऐकू आला, असे एका स्थानिकाने पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. या घटनेनंतर लाहोरमधील विमानवाहतूक तातडीने थांबवण्यात आली आहे. लाहोरमधील वॉल्टन विमानतळ, गोपालनगर आणि नसराबाद या तीन ठिकाणी असे एकूण तीन स्फोट झाल्याचे वृत्त पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर हा दुसरा हल्ला झाल्याचे पाकिस्तानमधील निवडक वृत्तवाहिन्या सांगत आहे. भारताने या स्फोटांबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.


स्फोटांचे आवाज ऐकू येताच लाहोरमध्ये ठिकठिकाणी सायरन वाजू लागले. लोक भराभर सुरक्षित ठिकाण गाठू लागले. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत वॉल्टन विमानतळ परिसरात स्फोटामुळे निर्माण झालेला धूर दिसत आहे. पाकिस्तानमधून आलेल्या ताज्या वृत्तानुसार कराची, लाहोर, सियालकोट येथील विमानवाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही विमानवाहतूक बंद राहणार आहे.

Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी