लाहोरमध्ये लागोपाठ तीन स्फोट, पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण

  101

लाहोर : भारतीय सैन्याने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर गुरुवार ८ मे रोजी लाहोरमध्ये लागोपाठ तीन स्फोट झाले. या स्फोटांमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने पुन्हा हवाई हल्ला केल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू झाली आहे. स्फोट लाहोरच्या जुन्या विमानतळाच्या जवळ झाले.


लाहोरच्या जुन्या विमानतळाच्या आवारात ड्रोन पडला. यानंतर स्फोटाचा आवाज ऐकू आला, असे एका स्थानिकाने पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. या घटनेनंतर लाहोरमधील विमानवाहतूक तातडीने थांबवण्यात आली आहे. लाहोरमधील वॉल्टन विमानतळ, गोपालनगर आणि नसराबाद या तीन ठिकाणी असे एकूण तीन स्फोट झाल्याचे वृत्त पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर हा दुसरा हल्ला झाल्याचे पाकिस्तानमधील निवडक वृत्तवाहिन्या सांगत आहे. भारताने या स्फोटांबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.


स्फोटांचे आवाज ऐकू येताच लाहोरमध्ये ठिकठिकाणी सायरन वाजू लागले. लोक भराभर सुरक्षित ठिकाण गाठू लागले. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत वॉल्टन विमानतळ परिसरात स्फोटामुळे निर्माण झालेला धूर दिसत आहे. पाकिस्तानमधून आलेल्या ताज्या वृत्तानुसार कराची, लाहोर, सियालकोट येथील विमानवाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही विमानवाहतूक बंद राहणार आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )