उत्तरकाशीत हेलिकॉप्टर कोसळले, तीन मुंबईकरांचा मृत्यू

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी आहे. जखमी व्यक्तीला उपचारांसाठी एम्स हृषिकेश येथे दाखल करण्यात आले आहे.


हेलिकॉप्टर एअरोट्रान्स कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर सहस्रधारा हेलिपॅड येथून उड्डाण केल्यानंतर हर्षिलच्या दिशेने येत होते. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि सहा प्रवासी असे एकूण सात जण होते. प्रवाशांपैकी चार जण मुंबईचे आणि दोन जण आंध्रचे रहिवासी होते. मृतांमध्ये तीन मुंबईकर आहेत.


उत्तरकाशी जिल्ह्यात गुरुवार ८ मे २०२५ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानी जवळ हेलिकॉप्टर कोसळले. दुर्घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलीस, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे पथक आणि स्थानिक यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.


अपघाताची माहिती मिळताच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी एक्स पोस्ट करुन शोक व्यक्त केला. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. नियमानुसार मृतांच्या नातलगांना आणि जखमी व्यक्तीला उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उत्तराखंडमध्ये मागील दोन - चार दिवसांपासून वातावरण प्रतिकूल आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अवकाळी पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. वादळी वारे वाहू लागल्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले आहे.


हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची यादी


कला सोनी, ६१, मुंबई
विजया रेड्डी, ५७, मुंबई
रुची अग्रवाल, ५६, मुंबई
राधा अग्रवाल, ७९, उत्तर प्रदेश
वेदवती कुमारी, ४८, आंध्र प्रदेश
वैमानिक रॉबिन सिंह, ६०, गुजरात


गंभीर जखमी


मस्तू भाकर, ६०, आंध्र प्रदेश

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या