उत्तरकाशीत हेलिकॉप्टर कोसळले, तीन मुंबईकरांचा मृत्यू

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी आहे. जखमी व्यक्तीला उपचारांसाठी एम्स हृषिकेश येथे दाखल करण्यात आले आहे.


हेलिकॉप्टर एअरोट्रान्स कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर सहस्रधारा हेलिपॅड येथून उड्डाण केल्यानंतर हर्षिलच्या दिशेने येत होते. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि सहा प्रवासी असे एकूण सात जण होते. प्रवाशांपैकी चार जण मुंबईचे आणि दोन जण आंध्रचे रहिवासी होते. मृतांमध्ये तीन मुंबईकर आहेत.


उत्तरकाशी जिल्ह्यात गुरुवार ८ मे २०२५ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानी जवळ हेलिकॉप्टर कोसळले. दुर्घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलीस, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे पथक आणि स्थानिक यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.


अपघाताची माहिती मिळताच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी एक्स पोस्ट करुन शोक व्यक्त केला. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. नियमानुसार मृतांच्या नातलगांना आणि जखमी व्यक्तीला उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उत्तराखंडमध्ये मागील दोन - चार दिवसांपासून वातावरण प्रतिकूल आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अवकाळी पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. वादळी वारे वाहू लागल्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले आहे.


हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची यादी


कला सोनी, ६१, मुंबई
विजया रेड्डी, ५७, मुंबई
रुची अग्रवाल, ५६, मुंबई
राधा अग्रवाल, ७९, उत्तर प्रदेश
वेदवती कुमारी, ४८, आंध्र प्रदेश
वैमानिक रॉबिन सिंह, ६०, गुजरात


गंभीर जखमी


मस्तू भाकर, ६०, आंध्र प्रदेश

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार