PBKS vs DC, IPL 2025: दिल्लीसाठी आजचा विजय महत्वाचा

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली सुरुवातीला ज्या वेगाने चालली होती त्या वेगाला खीळ बसली असून गेले तीन सामने दिल्ली विजयापासून वंचित राहिली आहे. मागच्या सामन्यातील दिल्लीची फलंदाजी ही अत्यंत निराशाजनक होती, पावसामुळे त्यांना एक गुण मिळाला अथवा दिल्लीचा पराभव नक्कीच होता. तसेच आज दिल्ली धर्मशाळा येथे पंजाबला टक्कर देणार आहे. त्याचप्रमाणे सध्या दिल्ली गुणतक्त्यात १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर पंजाब १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


दिल्लीला पात्रता फेरीत स्थान मिळवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे कारण मुंबई चौथ्या स्थानावर असून मुंबईच्या पुढे जायचे असल्यास आज विजय आवश्यक आहे. आजचा सामना धर्मशाळा येथे असल्यामुळे पावसाची शक्यता आहे, असे झाले तर दोन्ही संघाना १-१ गुण मिळेल अवणि त्याचा सर्वांत जास्त परिणाम दिल्लीवर होईल. एक गुण मिळाल्यामुळे त्यांची गुण संख्या १४ होईल व गुणतक्त्यात दिल्ली पाचव्याच स्थानावर राहील.


आज पंजाबने सामना गमावला तर त्यांना जास्त काही फरक पडणार नाही ते त्याच स्थानाचर राहतील; परंतु पंजाबचा संघ हा धोका पत्करणार नाही ते सामना जिंकून गुणतक्यात अव्वल स्थान मिळवतील, असे पण पंजाबची फलंदाजी दिल्लीपेक्षा चांगली असल्यामुळे ते सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. तसेच आजची लढत अटीतटीची होणार आहे. चला तर मग रंगतदार सामन्याची मन्ना घेऊ.

Comments
Add Comment

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ