PBKS vs DC, IPL 2025: दिल्लीसाठी आजचा विजय महत्वाचा

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली सुरुवातीला ज्या वेगाने चालली होती त्या वेगाला खीळ बसली असून गेले तीन सामने दिल्ली विजयापासून वंचित राहिली आहे. मागच्या सामन्यातील दिल्लीची फलंदाजी ही अत्यंत निराशाजनक होती, पावसामुळे त्यांना एक गुण मिळाला अथवा दिल्लीचा पराभव नक्कीच होता. तसेच आज दिल्ली धर्मशाळा येथे पंजाबला टक्कर देणार आहे. त्याचप्रमाणे सध्या दिल्ली गुणतक्त्यात १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर पंजाब १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


दिल्लीला पात्रता फेरीत स्थान मिळवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे कारण मुंबई चौथ्या स्थानावर असून मुंबईच्या पुढे जायचे असल्यास आज विजय आवश्यक आहे. आजचा सामना धर्मशाळा येथे असल्यामुळे पावसाची शक्यता आहे, असे झाले तर दोन्ही संघाना १-१ गुण मिळेल अवणि त्याचा सर्वांत जास्त परिणाम दिल्लीवर होईल. एक गुण मिळाल्यामुळे त्यांची गुण संख्या १४ होईल व गुणतक्त्यात दिल्ली पाचव्याच स्थानावर राहील.


आज पंजाबने सामना गमावला तर त्यांना जास्त काही फरक पडणार नाही ते त्याच स्थानाचर राहतील; परंतु पंजाबचा संघ हा धोका पत्करणार नाही ते सामना जिंकून गुणतक्यात अव्वल स्थान मिळवतील, असे पण पंजाबची फलंदाजी दिल्लीपेक्षा चांगली असल्यामुळे ते सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. तसेच आजची लढत अटीतटीची होणार आहे. चला तर मग रंगतदार सामन्याची मन्ना घेऊ.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत