Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. आता नुकतंच पाकिस्तानकडून जम्मूमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला. आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू दिसल्याने संपूर्ण जम्मूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जम्मूपाठोपाठ आता काश्मीरमधील कुपवाडामध्ये गोळीबार करण्यात आला.



जम्मू शहरात स्फोटांचे आवाज ऐकूआल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर शहरात एअर सायरन वाजवण्यात आले आणि तातडीने संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले. नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्मूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. स्फोटांच्या आवाजामुळे जम्मूतील हवाई सुरक्षा यंत्रणा (एअर डिफेन्स सिस्टीम) सक्रिय करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये ५ ते ६ स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




 १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न


७ आणि ८  मे च्या रात्री पाकिस्तानने भारतातील १५  शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपुर, बठिंडा, चंडीगढ़, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सारख्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताकडे असलेल्या अत्याधुनिक S-४०० सिस्टिमने पाकिस्तानचा मिसाईल, ड्रोन हल्ले फेल ठरवला.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने