IND-PAK तणावादरम्यान शिफ्ट झाला IPL चा सामना, आता धरमशाला नव्हे तर या ठिकाणी होणार सामना

  143

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये


अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार, ११ मे रोजी धर्मशाला येथे होणारा पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.हा सामना धर्मशालाहून अहमदाबादला हलवण्यात आला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी ही माहिती दिली आहे. हा सामना आता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.


पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना ११ मे रोजी दुपारी ३.३० वाजता अहमदाबाद येथे खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे हा सामना धर्मशालाहून अहमदाबादला हलवण्यात आला आहे. कारण भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण असल्याने धर्मशाला विमानतळासह अनेक महत्त्वाची विमानतळे बंद ठेवण्यात आली आहेत.


विमान सेवा बंद असल्याने आयपीएल संघांना प्रवास करण्यात अडथळे येत असल्याने पंजाब आणि मुंबई सामन्याचे स्थळ बदलण्यात आले आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल म्हणाले की, बीसीसीआयने आम्हाला विनंती केली होती आणि आम्ही ती स्वीकारली. मुंबई संघ आज, गुरुवारी संध्याकाळी येथे पोहोचत आहे आणि पंजाब दौऱ्याचे वेळापत्रक नंतर कळेल. गुरुवारी धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना होणार आहे.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट