IND-PAK तणावादरम्यान शिफ्ट झाला IPL चा सामना, आता धरमशाला नव्हे तर या ठिकाणी होणार सामना

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये


अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार, ११ मे रोजी धर्मशाला येथे होणारा पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.हा सामना धर्मशालाहून अहमदाबादला हलवण्यात आला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी ही माहिती दिली आहे. हा सामना आता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.


पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना ११ मे रोजी दुपारी ३.३० वाजता अहमदाबाद येथे खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे हा सामना धर्मशालाहून अहमदाबादला हलवण्यात आला आहे. कारण भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण असल्याने धर्मशाला विमानतळासह अनेक महत्त्वाची विमानतळे बंद ठेवण्यात आली आहेत.


विमान सेवा बंद असल्याने आयपीएल संघांना प्रवास करण्यात अडथळे येत असल्याने पंजाब आणि मुंबई सामन्याचे स्थळ बदलण्यात आले आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल म्हणाले की, बीसीसीआयने आम्हाला विनंती केली होती आणि आम्ही ती स्वीकारली. मुंबई संघ आज, गुरुवारी संध्याकाळी येथे पोहोचत आहे आणि पंजाब दौऱ्याचे वेळापत्रक नंतर कळेल. गुरुवारी धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना होणार आहे.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए