धरमशालाचे विमानतळ बंद, शिफ्ट होणार मुंबई-पंजाब IPL सामना?

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर देशातील उत्तर आणि पश्चिम भागातील कमीत कमी १८ विमानतळे बंद करण्यात आली. यात श्रीनगर, लेहर, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धरमशाला आणि जामनगर यांचा समावेश आहे.



शिफ्ट होणार मुंबई-पंजाबचा सामना?


पाकिस्तानमध्ये दहशतवादी ठिकाणांवर भारताच्या मिसाईल हल्ल्यानंतर धरमशाला विमानतळ अस्थायी रूपाने बंद झाल्यानंतर आयपीएलच्या संघांचा प्रवास प्रभावित झाला आहे. धरमशालामध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. यानंतर ११ मेला पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई आणि पंजाब यांच्यातील ११ मेचा सामना मुंबईत शिफ्ट होऊ शकतो.


धरमशाला पंजाब किंग्स संघाचे दुसरे घरगुती मैदान आहे. पंजाब संघाला प्रवासासंबंधी कोणताही त्रास नाही. कारण ते या आठवड्याच्या अखेरीपर्यंत ते तिथेच राहतील. मुंबई संघाचा प्रवासाचा कार्यक्रम अजूनही अनिश्चित आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळेस सर्व काही अनिश्चित आहहे. संघांशी बातचीत सुरू आहे.

Comments
Add Comment

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात

Vaibhav Suryawanshi : '७ षटकार, ७ चौकार'! वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राच्या गोलंदाजीचे मोडले कंबरडे, केली नाबाद १०८ धावांची वादळी खेळी!

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ (Syed Mushtaq Ali Trophy Elite 2025) मध्ये सातत्याने अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केल्यामुळे युवा फलंदाज

एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सुरुवात! केएलने केले रोहीत आणि विराटच्या जोडीचे कौतुक

मुंबई: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वनडे सामना जिंकला. पण हा सामना संपल्यावर रोहित शर्मा आणि विराट

Ind beat Sa 1st ODI : थरार शेवटच्या षटकापर्यंत! रांची वनडेत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय; विराटचे शतक, कुलदीपचा भेदक मारा

रांची : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिला रोमांचक सामना