मोखाड्यातील नागरिकांच्या घशाला कोरड कायम


  • २५० कोटींची योजना; गाव-पाड्यांत भीषण टंचाई

  • दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचे सावट

  • वारघडपाडा,घोसाळी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू

  • ७ पाणीपुरवठा योजना बंद


मोखाडा : डोंगर, दऱ्यांनी व्यापलेल्या मोखाडा तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचे सावट गडद आहे. नागरिकांना घरोघरी नळाने पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अडीचशे कोटीहून अधिक रकमेच्या योजनेतून तसेच जिल्हा परिषदेने ही पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला. मात्र या योजनांची कामे रखडल्याने तालुकावासियांच्या घशाला कोरड कायम आहे. यंदा ३० गाव-पाड्यांत भीषण टंचाई असून त्यांना टँकरने पाणीपुरवठा होतो आहे तर तेही पाणी पुरत नसल्याने महिला हंडाभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून दोन-तीन किमीचा प्रवास करताना दिसत आहेत.


मोखाड्यात ३० गाव-पाड्यांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून नगरपंचायत क्षेत्रात सुद्धा ६ गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. गभालपाडा व माळी पाडा येथील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. मोखाडा तालुक्यातील प्रमुख योजना अप्पर वैतरणा धरणसाठ्यावरून तयार केली असून हेच पाणी अनेक गावपाड्यांजवळील एका टाकीपर्यंत पोहोचवले गेले आहे. तिथून पुन्हा गावात आणि घरात नळ देण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून छोट्या योजना बनवून कामे चालू आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग अशी दोघांची मिळून ही योजना प्रत्येकाच्या घरात पाणी पोहोचवणार होती. मात्र या कामांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी सुद्धा पाणी केवळ टाक्यांपर्यंत आणि तेथून कसेबरे विहीरीत पाणी नेले जाते.



सुरुवातीपासून योजना वादग्रस्त


पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास तालुक्याची पाणीसमस्या यामुळे सुटणार आहे. मात्र अगदी सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली होती, कारण जीवन प्राधिकरणाकडून खोदाई करताना नियम पाळले गेले नाहीत. अर्ध्यापेक्षा जास्त पाइप रस्त्याला लागून पुरले गेले आहेत. आधी सिमेंटच्या टाक्या बांधण्यात येणार असताना मध्येच अंदाजपत्रकात बदल करून काम उरकावे म्हणून अॅल्युमिनियमच्या टाक्या बांधल्या यामुळे टाकीचे आयुष्य कमी झाले आहे.



या गावांत टंचाई


गोळीचापाडा, धामोडी, वारघडपाडा, वाशाळा, मडक्याची मेट हनुमान टेकडी, केवनाळा,पाथर्डी, हेदवाडी, गोमघर, वाघवाडी, किनिस्तेपैकी गवरचरीपाडा, जांभूळवाडी या ग्रामीण भागातील गावांप्रमाणेच मोखाडा शहरातील वारघडपाडा, घोसाळी आणि तेलीपाडा या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असून मेपर्यंत ही टंचाई अधिक प्रमाणात वाढणार आहे.

Comments
Add Comment

High Court Recruitment Exam : उच्च न्यायालय भरती परीक्षेत 'AI' च्या मदतीने कॉपी; धुळ्यातील धक्कादायक प्रकार

धुळे : आजवर परीक्षेत कॉपी करण्याच्या अनेक जुन्या पद्धती समोर आल्या आहेत, मात्र आता कॉपीबहाद्दरांनी यासाठी चक्क

Jalgaon : जळगाव–दिल्ली विमानसेवा तात्पुरती स्थगित; बहुप्रतिक्षीत विमानसेवा कधी सुरु होणार ?

जळगाव : अलायन्स एयर (Alliance Air) या विमान कंपनीतर्फे २ मेपासून सुरु होणारी बहुप्रतिक्षीत जळगाव–दिल्ली (इंदूरमार्गे) ही

महाराष्ट्राच्या 'मिसिंग लिंक' या ड्रीम प्रोजेक्टची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणारा महत्त्वाकांक्षी असलेला मिसिंग लिंक

Eknath Shinde On Missing Link : पैसे न घेता गाड्या सोडा..."; मिसिंग लिंकवर ट्रॅफिक कोंडी पाहताच हेलिपॅडवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा पोलिसांना थेट फोन!

मुंबई : सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे, महाबळेश्वर आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या

Devendra Fadnavis On missing link : "तुमच्या सरकारने थांबवलेलं काम आम्ही पूर्ण केलं..."; फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला, मिसिंग लिंकचं दिमाखात लोकार्पण!

मुंबई : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

Digital Census 2027 : शंभूराज देसाई यांच्याकडून साताऱ्यात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; नागरिकांना 'स्व-गणनेत' सहभागी होण्याचे आवाहन

सातारा : भारताच्या विकासाचा पाया ठरणारी आणि भविष्यातील धोरणांची दिशा ठरवणारी आगामी 'जनगणना २०२७' आता अधिक हायटेक