पंतप्रधान मोदींचा युरोपीय देशांचा परदेश दौरा रद्द

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतातर्फे 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ तळं नष्ट केले. यामुळे सीमेवरील तणाव अधिकच वाढला आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड या युरोपीय देशांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.


भारताने पाकिस्‍तानवर केलेल्‍या एअर स्‍ट्राईकचे पंतप्रधान मोदी हे मॉनिटरींग करत होते. यावेळी त्‍यांच्यासोबत अजित डोवालही उपस्‍थित होते. ते पीएम मोदी यांना प्रत्‍येक वेळेची अपडेट देत होते. त्यामुळे हल्ल्यामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी ७, कल्‍याण मार्ग येथून या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हे त्‍यांना प्रत्‍येक क्षणाची माहिती देत होते.



जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. पहलगाम हल्याच्या १४ दिवसांनंतर, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले.


भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत.


दरम्यान पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (सीसीएस) बैठक घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूर नंतरच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.

Comments
Add Comment

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ