Operation Sindoor On Social Media: ऑपरेशन सिंदूर नंतर, 'धर्मो रक्षति रक्षित:' झाला ट्रेंड, या श्लोकचा काय आहे अर्थ? जाणून घ्या

मुंबई: जेव्हा संपूर्ण देश झोपेत होता, तेव्हा भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याची माहिती सकाळी भारतीयांना मिळताच, 'धर्मो रक्षति रक्षित:' सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला,


भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशवाद्यांचे तळ हवाई हल्ल्याद्वारे बेचिराग करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने केलेल्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे समर्पक नाव देण्यात आले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात, भारतीय स्त्रियांचे सिंदूर पुसले गेले. हल्लेखोरांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, त्यांची ही कृती क्लेशदायी आणि संतापजनक अशीच आहे. ज्याचा देशभरात निषेध झाला. त्यानंतर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशभरातून होऊ लागली. आणि त्याच पार्श्वभूमीवर देशवासीयांच्या भावना जपत भारतीय लष्कराने दहशतवाद विरुद्ध मोठी कारवाई करत, बिळात लपून बसलेल्या अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला.


ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या या कारवाईची माहिती भारतीयांना मिळताच, "धर्मो रक्षति रक्षित:" हा श्लोक सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होऊ लागला. धर्मो रक्षती रक्षिता: हा संस्कृत श्लोक आणि ऑपरेशन सिंदूरचा एकमेकांशी काय संबंध आहे? याबद्दल जाणून घेऊया...



सोशल मीडियावर 'धर्मो रक्षिती रक्षितः' झाला ट्रेंड


'धर्मो रक्षति रक्षितः' हा व्हायरल होत असलेला श्लोक पूर्ण जरी नसला तरी हा एक लोकप्रिय संस्कृत वाक्प्रचार आहे, ज्याचा उल्लेख महाभारत आणि मनुस्मृतीतही आहे. याचा अर्थ असा की जर आपण धर्माचे रक्षण केले तर तो आपले रक्षण करतो. या श्लोकाचा ऑपरेशन सिंदूरशी काय संबंध आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया...



ऑपरेशन सिंदूरशी काय संबंध?


भारताच्या हवाई हल्ल्यानंतर 'धर्मो रक्षति रक्षिता' हा श्लोक सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. हा श्लोक धर्माच्या शक्तीचे प्रतीक असून, याबरोबरच सर्वत्र भारत माता की जयच्या घोषणा देखील दिल्या जात आहेत. हा श्लोक दर्शवतो की हा धर्म कधीही नष्ट होऊ शकत नाही. जर कोणी या धर्माविरुद्ध कट रचला तर हा धर्म त्याचा नाश करतो. 'धर्मो रक्षति रक्षित:' चा उल्लेख महाभारतात देखील आढळतो .



मनुस्मृतीच्या संपूर्ण श्लोकाचा भाग


हा संस्कृत वाक्प्रचार मनुस्मृतीच्या संपूर्ण श्लोकाचा भाग आहे, जो पुढीलप्रमाणे आहे...
धर्मो एव हतो हंति धर्मो रक्षिती रक्षितः.
तस्माधर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हटोवधित ।


म्हणजेच, जेव्हा धर्म नष्ट होतो, तेव्हा तो त्याचा नाश करणाऱ्यांचा नाश करतो आणि संरक्षित धर्म त्याचे रक्षण करणाऱ्याचे रक्षण करतो. म्हणून, आपण कधीही धर्माचे उल्लंघन करू नये जेणेकरून नष्ट झालेला धर्म आपल्याला कधीही नष्ट करणार नाही.

Comments
Add Comment

Venezuela India Partnership : व्हेनेझुएला लवकरच भारताचा मोठा तेल पुरवठादार होणार, अमेरिकेने दिले संकेत

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ (Marco Rubio) लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी

PM Narendra Modi : कामात हलगर्जीपणा टाळा, मोदींचा मंत्र्यांना इशारा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) परदेश दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाची

'Vande Mataram' Mandatory in Madrasas : बंगाल सरकारचा मोठा निर्णय; आता बंगालमधील मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ गायन अनिवार्य

कोलकाता : पश्चिम बंगालमधील शुभेंदू सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बंगाल सरकारच्या अल्पसंख्याक कार्य आणि

Bengaluru Airport : बंगळूरु विमानतळावर मोठा अपघात टळला! लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाची धावपट्टीला धडक, १७९ प्रवासी थोडक्यात बचावले

बंगळुरू : दिल्लीहून बंगळूरुला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक

Weather Update IMD Alert : पुढील १५ तास धोक्याचे! १७ राज्यांमध्ये वादळी पाऊस, तर उत्तर भारतात उष्णतेचा कहर

उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील १७ राज्यांसाठी मोठा हवामान

Cockroach Janta Party : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी 'कॉकरोच जनता पार्टी' खऱ्या राजकारणात उतरणार? संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं!

सध्या इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या दुनियेत एका अत्यंत अनोख्या नावाची तुफान चर्चा रंगली आहे, ते नाव म्हणजे