KKR vs CSK, IPL 2025: कोलकत्ताची पात्रता फेरीच्या दिशेने वाटचाल

मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामातील शेवटच्या सत्रात कोलकत्ताची फलंदाजी बहरत चालली आहे. गेल्या सामन्यात कोलकत्ताच्या आंद्रे रसेलला सुर गवसला आणि त्याने ह्या हंगामातील पहिले अर्धशतक ठोकले. कोलकत्तासाठी ही एक चांगली बातमी आहे. मागील दोन्ही सामने जिंकल्यामुळे कोलकत्ताचे मनोबल नक्कीच उंचावले आहे व ते त्यांच्या कामगिरीतून निश्चितच दिसून येत आहे.


आजचा सामना कोलकत्तासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण चेन्नईचा संघ सध्या फॉर्ममध्ये नाही आहे त्यामुळे त्यांना हरवणे शक्य आहे. आणखी एक जमेची बाजू म्हणजे आजचा सामना कोलकत्ता घरच्या मैदानावर खेळणार आहे याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.


ईडन गार्डनचे मैदान फिरकीला साथ देते त्यामुळे सुनील नारायणन व वरुण चक्रवर्ती हे आजचा सामना नक्कीच गाजवतील. कोलकत्तासाठी चिंतेची बाब म्हणजे चेन्नईचा फिरकी गोलंदाज नूर अहमद, ज्याने या हंगामात चेन्नईतर्फे सर्वाधिक बळी घेतले आहेत. चेन्नईसाठी खुश खबर म्हणजे सलामीवीर आयुष म्हात्रेला गवसलेला सूर, त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध ४८ चेंडूत ९४ धावा केल्या. चला तर बघूया अटी तटीच्या सामन्यात कोण बाजी मारणार.

Comments
Add Comment

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील

Virat Kohli Ideal RCB team : एबीपासून स्टार्कपर्यंत दिग्गजांचा समावेश; जाणून घ्या किंग कोहलीचा ऑल टाईम फेव्हरेट आरसीबी संघ

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीसाठी आपली ‘ऑल-टाइम

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा

पाकिस्तानच्या 'या' खेळाडूला आपलाच संताप पडला महागात; आयसीसीकडून डिमेरिट पॉइंटची शिक्षा

पाकिस्तानचा फलंदाज सलमान आघा Salman Agha पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावबाद झाल्यानंतर