KKR vs CSK, IPL 2025: कोलकत्ताची पात्रता फेरीच्या दिशेने वाटचाल

मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामातील शेवटच्या सत्रात कोलकत्ताची फलंदाजी बहरत चालली आहे. गेल्या सामन्यात कोलकत्ताच्या आंद्रे रसेलला सुर गवसला आणि त्याने ह्या हंगामातील पहिले अर्धशतक ठोकले. कोलकत्तासाठी ही एक चांगली बातमी आहे. मागील दोन्ही सामने जिंकल्यामुळे कोलकत्ताचे मनोबल नक्कीच उंचावले आहे व ते त्यांच्या कामगिरीतून निश्चितच दिसून येत आहे.


आजचा सामना कोलकत्तासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण चेन्नईचा संघ सध्या फॉर्ममध्ये नाही आहे त्यामुळे त्यांना हरवणे शक्य आहे. आणखी एक जमेची बाजू म्हणजे आजचा सामना कोलकत्ता घरच्या मैदानावर खेळणार आहे याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.


ईडन गार्डनचे मैदान फिरकीला साथ देते त्यामुळे सुनील नारायणन व वरुण चक्रवर्ती हे आजचा सामना नक्कीच गाजवतील. कोलकत्तासाठी चिंतेची बाब म्हणजे चेन्नईचा फिरकी गोलंदाज नूर अहमद, ज्याने या हंगामात चेन्नईतर्फे सर्वाधिक बळी घेतले आहेत. चेन्नईसाठी खुश खबर म्हणजे सलामीवीर आयुष म्हात्रेला गवसलेला सूर, त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध ४८ चेंडूत ९४ धावा केल्या. चला तर बघूया अटी तटीच्या सामन्यात कोण बाजी मारणार.

Comments
Add Comment

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे