KKR vs CSK, IPL 2025: कोलकत्ताची पात्रता फेरीच्या दिशेने वाटचाल

  82

मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामातील शेवटच्या सत्रात कोलकत्ताची फलंदाजी बहरत चालली आहे. गेल्या सामन्यात कोलकत्ताच्या आंद्रे रसेलला सुर गवसला आणि त्याने ह्या हंगामातील पहिले अर्धशतक ठोकले. कोलकत्तासाठी ही एक चांगली बातमी आहे. मागील दोन्ही सामने जिंकल्यामुळे कोलकत्ताचे मनोबल नक्कीच उंचावले आहे व ते त्यांच्या कामगिरीतून निश्चितच दिसून येत आहे.


आजचा सामना कोलकत्तासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण चेन्नईचा संघ सध्या फॉर्ममध्ये नाही आहे त्यामुळे त्यांना हरवणे शक्य आहे. आणखी एक जमेची बाजू म्हणजे आजचा सामना कोलकत्ता घरच्या मैदानावर खेळणार आहे याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.


ईडन गार्डनचे मैदान फिरकीला साथ देते त्यामुळे सुनील नारायणन व वरुण चक्रवर्ती हे आजचा सामना नक्कीच गाजवतील. कोलकत्तासाठी चिंतेची बाब म्हणजे चेन्नईचा फिरकी गोलंदाज नूर अहमद, ज्याने या हंगामात चेन्नईतर्फे सर्वाधिक बळी घेतले आहेत. चेन्नईसाठी खुश खबर म्हणजे सलामीवीर आयुष म्हात्रेला गवसलेला सूर, त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध ४८ चेंडूत ९४ धावा केल्या. चला तर बघूया अटी तटीच्या सामन्यात कोण बाजी मारणार.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र