KKR vs CSK, IPL 2025: चेन्नईने केकेआरला हरवले, शेवटच्या षटकात धोनीच्या संघाचा विजय

  183

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज ५७व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकत्ता नाईट रायडर्सला २ विकेटनी हरवले. केकेआरने चेन्नईसमोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईने हे आव्हान २ विकेट राखत पूर्ण केले.


केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईच्या संघाने ८ बाद १८३ धावा केल्या.


कोलकाता नाईट रायडर्ससाठी कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४८ धावा केल्या. रहाणेने ३३ बॉलमध्ये ४ चौकार आणि दोन षटकार ठोकले. आंद्रे रसेलनेही ४ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २१ बॉलमध्ये ३८ धावांची जबरदस्त खेळी केली.


तर अनुभवी फलंदाज मनीष पांडेने नाबाद ३६ आणि सलामी फलंदाज सुनील नरेनने २६ धावांचे योगदान दिले. चेन्नई सुपर किंग्सकडून स्पिनर नूर अहदमने सर्वाधिक चार विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र