'ऑपरेशन सिंदूर'मुळे बांगलादेश क्रिकेट संघ चिंतेत

ढाका : भारताने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणावर हवाई हल्ले केले.यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत, परंतु बांगलादेशमध्येही दहशत दिसून येत आहे. या प्रकरणात बांगलादेशने आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएल सध्या पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे. अजूनही बरेच सामने बाकी आहेत. तथापि, आतापर्यंतच्या वृत्तांनुसार, पीएसएल त्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहील. दरम्यान, पाकिस्तानमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर, बांगलादेशला सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या आणि पीएसएल खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंची चिंता वाटू लागली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधला आहे आणि पीएसएलमध्ये खेळणाऱ्या त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षिततेबद्दल बोलले आहे असे वृत्त आहे.

बांगलादेशचा लेग-स्पिनर रिशाद हुसेन लाहोर कलंदर्सकडून खेळत आहे, तर वेगवान गोलंदाज नाहिद राणा पेशावर झल्मीचा खेळाडू आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेळाडूंच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील याची खात्री करण्यासाठी ते पीसीबी आणि इस्लामाबादमधील त्यांच्या उच्चायुक्तांच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे लवकरच बांगलादेश क्रिकेट संघही पाकिस्तानचा दौरा करणार आहे, जिथे पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. ही मालिका मे महिन्याच्या २५ तारखेपासून आहे, ही मालिका देखील रद्द होण्याची शक्यता आहे.

सध्या फक्त दोन बांगलादेशी खेळाडू पाकिस्तानात आहेत.बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी सांगितले की, त्यांच्याकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, ते अजूनही वाट पाहत आहेत. येत्या काळात पाकिस्तानमध्ये परिस्थिती कशी असेल ते आपल्याला पहावे लागेल. बांगलादेश संघाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत ते म्हणाले की, त्यासाठी पुढील चार ते पाच दिवस वाट पाहावी लागेल. यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या त्यांची चिंता नाहिद राणा आणि रियाज हुसेन यांची आहे, जे सध्या पाकिस्तानात आहेत.

Comments
Add Comment

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड

भारत ऐतिहासिक कामगिरी करणार ?

मुंबई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये २००७ पासून आतापर्यंत भारत तीन वेळा फायनलमध्ये धडकला आहे. टीम

Pakistan Player : खेळाडू की हैवान; पाकिस्तानी खेळाडूंकडून मैदानाबाहेर महिलांचा विनयभंग

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.