SRH vs DC सामन्यानंतर बदलले IPLचे संपूर्ण समीकरण, प्ले ऑफच्या शर्यतीत हे संघ

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी हैदराबाद आणि दिल्ली यांच्यातील सामना अनिर्णीत ठरला. पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघाना केवळ एकच गुण मिळाला. मात्र यामुळे हैदराबादच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या आहेत. जाणून घेऊया की आता आयपीएलच्या प्लेऑफचे समीकरण काय असणार आहे...



जाणून घेऊया पॉईंट्स टेबलचे गणित


या सामन्यात पावसाने व्यत्यय घातल्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये जबरदस्त बदल झाले आहेत. दिल्लीच्या संघाला एक गुण मिळाला आहे आणि ते सध्या पाचव्या स्थानावर आहेत. आतापर्यंत दिल्लीने ११ सामने खेळले आहेत आणि ६ विजयासह त्यांचे १३ गुण आहेत. म्हणजेच आता दिल्लीचे ३ सामने बाकी आहे आणि प्लेऑफच्या आशा कायम आहेत.


तर हैदराबादचा संघ ११ सामन्यांमध्ये ७ गुणांसह ८व्या स्थानावर आहे. म्हणजेच जर हैदराबादने आपलेले उरलेले ३ सामने जरी जिंकले तरी त्यांचे एकूण १३ अंक होतील. म्हणजेच हैदराबादच्या आशा संपल्या आहेत. राजस्थान आणि चेन्नई नंतर आता हैदराबादचा तिसरा संघ आहे जो प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.


सध्याच्या वेळेस पॉईंट्सटेबलमध्ये आरसीबीचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांचे ११ सामन्यात ८ विजयासह १६ गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहेत. त्यांचे ११ सामन्यांत ७ विजयासह १५ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर मुंबईचा संघ आहे. त्यांनी ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. १४ गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. गुजरातचा संघ १० सामन्यांपैकी ७ सामने जिंकत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.


सगळ्यात तगडी टक्कर कोलकाता आणि लखनऊ यांच्यात आहे. कोलकाताचे ११ सामन्यांत ११ गुण आहेत. म्हणजेच उरलेल्या ३ सामन्यांत केकेआरने विजय मिळवला तर त्यांचे १७ गुण होतील आणि ते प्ले ऑफमध्ये पोहोचतील. तर लखनऊच्या संघाचे अजूनही १० गुण आहे आणि ३ सामने बाकी आहेत. ते जर सर्व सामने जिंकले तर त्यांचेही १६ गुण होतील.


हैदराबाद आणि दिल्लीच्या या सामन्याने आता प्लेऑफची शर्यत अधिक रोमहर्षक झाली आहे.

Comments
Add Comment

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित