SRH vs DC सामन्यानंतर बदलले IPLचे संपूर्ण समीकरण, प्ले ऑफच्या शर्यतीत हे संघ

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी हैदराबाद आणि दिल्ली यांच्यातील सामना अनिर्णीत ठरला. पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघाना केवळ एकच गुण मिळाला. मात्र यामुळे हैदराबादच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या आहेत. जाणून घेऊया की आता आयपीएलच्या प्लेऑफचे समीकरण काय असणार आहे...



जाणून घेऊया पॉईंट्स टेबलचे गणित


या सामन्यात पावसाने व्यत्यय घातल्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये जबरदस्त बदल झाले आहेत. दिल्लीच्या संघाला एक गुण मिळाला आहे आणि ते सध्या पाचव्या स्थानावर आहेत. आतापर्यंत दिल्लीने ११ सामने खेळले आहेत आणि ६ विजयासह त्यांचे १३ गुण आहेत. म्हणजेच आता दिल्लीचे ३ सामने बाकी आहे आणि प्लेऑफच्या आशा कायम आहेत.


तर हैदराबादचा संघ ११ सामन्यांमध्ये ७ गुणांसह ८व्या स्थानावर आहे. म्हणजेच जर हैदराबादने आपलेले उरलेले ३ सामने जरी जिंकले तरी त्यांचे एकूण १३ अंक होतील. म्हणजेच हैदराबादच्या आशा संपल्या आहेत. राजस्थान आणि चेन्नई नंतर आता हैदराबादचा तिसरा संघ आहे जो प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.


सध्याच्या वेळेस पॉईंट्सटेबलमध्ये आरसीबीचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांचे ११ सामन्यात ८ विजयासह १६ गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहेत. त्यांचे ११ सामन्यांत ७ विजयासह १५ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर मुंबईचा संघ आहे. त्यांनी ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. १४ गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. गुजरातचा संघ १० सामन्यांपैकी ७ सामने जिंकत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.


सगळ्यात तगडी टक्कर कोलकाता आणि लखनऊ यांच्यात आहे. कोलकाताचे ११ सामन्यांत ११ गुण आहेत. म्हणजेच उरलेल्या ३ सामन्यांत केकेआरने विजय मिळवला तर त्यांचे १७ गुण होतील आणि ते प्ले ऑफमध्ये पोहोचतील. तर लखनऊच्या संघाचे अजूनही १० गुण आहे आणि ३ सामने बाकी आहेत. ते जर सर्व सामने जिंकले तर त्यांचेही १६ गुण होतील.


हैदराबाद आणि दिल्लीच्या या सामन्याने आता प्लेऑफची शर्यत अधिक रोमहर्षक झाली आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत