MI vs GT, IPL 2025: पावसामुळे सामना थांबला, गुजरातची चांगली धावसंख्या

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५६व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या सामन्यात टॉस जिंकत गुजरातच्या संघाने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १५५ धावा केल्या. दरम्यान, विजयासाठी १५६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या गुजरातने जबरदस्त सुरूवात केली. गुजरातची धावसंख्या १४ षटकांत २ बाद १०७ वर असताना पावसाचा व्यत्यय आल्याने सामना थांबवावा लागला आहे.



असा होता मुंबईचा डाव


पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या मुंबईची सुरूवात खराब राहिली. पहिल्याच षटकांत दुसऱ्या बॉलवर सिराजने रिकल्टनला बाद केले. रिकल्टनने केवळ २ धावा केल्या. यानंतर विल जॅक्सने जबरदस्त शॉट लगावत मुंबईला सांभाळण्याचा प्रयत्न केला.मात्र चौथ्या षटकांत रोहित शर्मा अर्शद खान शिकार बनला. रोहितने केवळ ७ धावा केल्या. यानंतर सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स यांनी मुंबईला सांभाळले. दोघांनी दिमाखदार फलंदाजी केली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र ११व्या षटकांत सूर्यकुमार यादव ३५ धावा करून बाद झाला.


यातच विल जॅक्सने २९ बॉलमध्ये शानदार अर्धशतक ठोकले. मात्र १२व्या षटकांत विल जॅक्सने आपली विकेट गमावली. जॅक्सने ५३ धावा केल्या. यात ३ षटकारांचा समावेश होता. मात्र यानंतर कर्णधार हार्दिककडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो एक धाव करून बाद झाला.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत