HSC Result : सरपंच संतोष देशमुखांच्या लेकीला बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश!

बीड : महाराष्ट्रातील बीड (Beed) जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते आणि छळ केल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात हाहाकार उडाला होता. तसेच देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. याचदरम्यान, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh HSC Result) हिने बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, या कठीण परिस्थितीमध्येही वैभवी देशमुखने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.



वैभवीला किती टक्के गुण?


नुकतेच दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल (HSC Result) जाहीर झाला. या परीक्षेत वैभवी देशमुखला (Vaibhavi Deshmukh) ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. वैभवीने बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून दिली होती. यामध्ये वैभवीला इंग्रजी विषयात ६३, मराठीत ८३, गणितामध्ये ९४, फिजिक्समध्ये ८३, केमेस्ट्रीत ९१ आणि बायोलॉजी विषयात ९८ गुण मिळाले आहेत. तिला एकूण ६०० पैकी ५१२ गुण मिळाले आहेत. वैभवीच्या या यशाने संपूर्ण बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळाली आहे.



माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत


वडिलांच्या आठवणी आणि न्यायासाठी लढण्याची जबाबदारी मनात घेऊन वैभवी आता पुढील शिक्षणासाठी सज्ज झाली आहे. आज वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे असं तिने म्हटले होते.  तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती.

Comments
Add Comment

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा

Mahayuti : विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच चुरस

जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य आहेत. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.