बोरिवलीहून कोकणात निघालेल्या खासगी बसला अपघात, दोघांचा मृत्यू

खेड : मुंबईतील बोरिवलीहून कोकणच्या दिशेने निघालेल्या ओमकार ट्रॅव्हलच्या खासगी बसला मुंबई गोवा महामार्गावर पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंड परिसरात रविवारी अकरा वाजता अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि ३० पेक्षा प्रवासी जखमी झाले.



ओमकार ट्रॅव्हल्सची एमएच ४७, वाय ७४८७ ही खासगी बस पस्तीस प्रवासी घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे निघाली होती. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस उटलली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाची रेस्क्यू टीम, वैद्यकीय पथक आणि स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय आणि पनवेल येथील गांधी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. एमजीएममध्ये २३ आणि दोन जणांवर गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


बस बोरिवलीहून सावंतवाडीच्या दिशेने निघाली होती. उन्हाळी सुट्या सुरू झाल्यामुळे सध्या कोकणच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आणि सरकारी बस भरुन जात आहेत. ही बोरिवली - सावंतवाडी मार्गावरील खासगी बस पण भरलेली होती. रात्री चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटून अपघात झाला. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अथक प्रयत्न करुन अपघातग्रस्त बस बाजुला केली आणि वाहतूक काही तासांत सुरळीत केली.


कर्नाळा खिंडीत वारंवार अपघात होत असतात. नागमोडी वळणांवर रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना अपुरी ठरत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक