बोरिवलीहून कोकणात निघालेल्या खासगी बसला अपघात, दोघांचा मृत्यू

खेड : मुंबईतील बोरिवलीहून कोकणच्या दिशेने निघालेल्या ओमकार ट्रॅव्हलच्या खासगी बसला मुंबई गोवा महामार्गावर पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंड परिसरात रविवारी अकरा वाजता अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि ३० पेक्षा प्रवासी जखमी झाले.



ओमकार ट्रॅव्हल्सची एमएच ४७, वाय ७४८७ ही खासगी बस पस्तीस प्रवासी घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे निघाली होती. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस उटलली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाची रेस्क्यू टीम, वैद्यकीय पथक आणि स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय आणि पनवेल येथील गांधी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. एमजीएममध्ये २३ आणि दोन जणांवर गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


बस बोरिवलीहून सावंतवाडीच्या दिशेने निघाली होती. उन्हाळी सुट्या सुरू झाल्यामुळे सध्या कोकणच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आणि सरकारी बस भरुन जात आहेत. ही बोरिवली - सावंतवाडी मार्गावरील खासगी बस पण भरलेली होती. रात्री चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटून अपघात झाला. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अथक प्रयत्न करुन अपघातग्रस्त बस बाजुला केली आणि वाहतूक काही तासांत सुरळीत केली.


कर्नाळा खिंडीत वारंवार अपघात होत असतात. नागमोडी वळणांवर रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना अपुरी ठरत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार