कुरुंदकरला जन्मठेप, तरी अश्विनी बिद्रेंच्या कुटुंबाला मृत्यू दाखला मिळेना

नवी मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात पनवेल जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे अश्विनी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असला तरी त्यांचा संघर्ष आजही संपलेला नाही. अश्विनी यांच्या मृत्यू दाखल्यासाठी पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला.


अश्विनी यांचा मृतदेह सापडला नाही किंवा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नाही, अशी कारणे देऊन पोलिसांनी मृत्यू दाखला देण्यास टाळाटाळ चालवली आहे. ही टाळाटाळ नऊ वर्षांनंतरही सुरू आहे. अश्विनी यांची हत्या झाल्याचे मान्य करत न्यायालयाने आरोपींना शिक्षाही ठोठावली. पण पोलिसांनी अद्याप अश्विनी यांचा मृत्यू दाखला दिलेला नाही.


अश्विनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिल्लक अर्जित रजेचा पगार, उपदान, बीसीपीआय फंडाची रक्कम आदी लाभ वारसांना मिळण्यासाठी मृत्यूचा दाखला आवश्यक आहे. आम्हाला न्याय मिळाला, पण मृत्यूचा दाखला अद्याप मिळालेला नाही, असे अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले.


सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हत्येप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर, अश्विनी बिद्रे यांच्या तुकडे केलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र, या दोन्ही आरोपींनी सात वर्षांची शिक्षा भोगलेली असल्याने या दोघांची सुटका झाली.


बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच अश्विनी बिद्रे यांची निर्घृणपणे हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत टाकून दिल्याचे साक्षीपुराव्यावरून सिद्ध झाले आहे. तसेच, कुंदन भंडारी व महेश फळणीकर या दोघांनी अश्विनीच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केल्याचे समोर आले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला

Narender Modi : पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आशिष शेलारांकडून 'कान्स' दौरा रद्द

 विभागाच्या बैठका आता ऑनलाइन; इंधन बचतीसाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा मोठा निर्णय मुंबई : मध्य पूर्वेतील

Dahisar River Revival Project : नदीत कचरा टाकणे जेव्हा बंद होईल, तेव्हाच दहिसर नदी स्वच्छतेचे जनआंदोलन होईल यशस्वी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल स्पष्टच बोलले

- दहिसर नदी पुनरुज्जीवन, सौंदर्यीकरण प्रकल्प (टप्पा १) कामाचे लोकार्पण मुंबई (विशेष प्रतिनिधी) नदी स्वच्छतेसाठी

Khandala-Lonavala : खंडाळा-लोणावळा घाटातील ७० टक्के वाहतूक वळली 'मिसिंग लिंक'कडे

अवघ्या १० दिवसांत बोरघाटातील चित्र बदलले; वेळ आणि इंधनाची बचत करत 'सुसाट' प्रवास मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती

Zero SPAD : EMU Local च्या सिग्नल प्रणालीत सुधारणा, मध्य रेल्वेचा सुरक्षिततेवर भर

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवासी आणि रेल्वे संचालनाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी

Supriya Sule : पुणे-मुंबई प्रवासादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात; सीट बेल्टमुळे मोठा अनर्थ टळला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या गाडीचा पुणे-मुंबई महामार्गावर