मुंबईच्या जंगलात ५४ बिबटे; १० वर्षात २३ ने वाढ

मुंबई (प्रतिनिधी): संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याला लागून असलेल्या आरे वसाहतीत सध्या ५४ बिबट्यांचे अस्तित्व असून त्यात ४ पिल्लांचाही समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटीने (डब्लूसीएस) केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. २०१४-१५ या कालावधीत ३१ बिबटे होते, तर दशकभरात या संख्येत २३ ने वाढ झाली आहे. या अभ्यासाठी महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या संयुक्त सहकायनि कॅमेऱ्याच्या मदतीने दिर्घकालीन निरीक्षण केले.


फेब्रुवारी ते जून २०२४ या फालावधीत करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षणातून बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आसपासच्या परिसरात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. या सर्वेक्षणात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे वसाहत आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य या क्षेत्रांचा समावेश होता. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षणामध्ये सक्रीय सहभाग घेतला आणि त्यासाठी विशेष प्रशिक्षणही घेतले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीत एकूण ५४ बिबटे आढळले, यामध्ये ३६ मादी, १६ नर आहेत. त्याचबरोबर बिबट्यांच्या चार पिल्लांचीही नोंद हा अधिवास जपणे किती महत्वाचे आहे हे या अभ्यासातून अधोरेखित होते. अशा अभ्यासामुळे वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची अचूक माहिती तर मिळतेच; परंतु त्याचबरोबरच त्याच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी मोठी मदत होते - अनिता पाटील, वन संरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली आहे.


वसईजवळील तुंगारेश्वर अभयारण्यातही तीन प्रौढ बिबट्यांची नोंद झाली. २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅप्सच्या मदतीने विबट्यांची गणना करण्यात आली. या माध्यमातून यावेळी २१ बिबट्यांची नोंद झाली होती. यामध्ये १६ मादी, १० नर आणि ५ बिबटे होते. दाट लोकवस्तीतही बिबट्याचे अस्तित्व टिकून आहे हे फार महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य