बारावीचा निकाल ९१.८८ टक्के, महाराष्ट्रातले १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ११ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान २०२५ दरम्यान घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार ५ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. हा निकाल दुपारी १ वाजता मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.


मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बारावीला ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेसाठी चौदा लाख २७ हजार ०८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी चौदा लाख सतरा हजार ९६९ जण परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्यांपैकी तेरा लाख दोन हजार ८७३ जण उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक उत्तीर्ण विद्यार्थी संख्या कोकणमध्येच आहे. सर्वात कमी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या लातूर विभागात आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के एवढा लागला तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के एवढा लागला. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागांतून विद्यार्थी परीक्षेला बसले होते.


यंदा सहा लाख २५ हजार ९०१ मुली, तर सहा लाख ७६ हजार ९७२ मुलगे बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे.


विभागनिहाय निकाल २०२५


कोकण -९६.७४
कोल्हापूर ९३.६४
मुंबई – ९२.९३
संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे -९१.३२
नाशिक -९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६


Comments
Add Comment

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.

मुंबईसह महत्त्वाच्या शहरांत मिळणार गरमागरम ‘मत्स्य पाव’- मंत्री नितेश राणे

 मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; रोजगारनिर्मितीसाठी राबवणार मोबाईल फूड व्हॅन योजना मुंबई : राज्यातील

लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ‘पालक अधिकारी’ नेमणार;  मंत्री प्रताप सरनाईक

 मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग