पद्मश्री विजेत्या योगगुरू स्वामी शिवानंद यांचे वाराणसी येथे १२९ व्या वर्षी निधन

वाराणसी : प्रसिद्ध योगगुरू आणि पद्मश्री पुरस्कार विजेते स्वामी शिवानंद सरस्वती यांचे रविवार ४ मे रोजी १२९ व्या वर्षी निधन झाले. ते तपस्वी जीवनशैली आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी तसेच योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध होते. पंतप्रधान मोदींसह सार्वजनिक जीवनातील अनेक दिग्गजांनी, शिवानंद सरस्वती यांच्या शिष्यांनी आणि स्थानिकांनी दिवंगत स्वामी शिवानंद सरस्वती यांना आदरांजली वाहिली.



स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग क्षेत्रात अतुलनीय कार्य केले शिवाय वंचितांसाठी आयुष्य वेचले. योग आणि मानवतावादी कार्यातील योगदानासाठी २०२२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौविण्यात आले होते. स्वामी शिवानंद त्यांच्या साधेपणा, शिस्त आणि भक्तीसाठी ओळखले जात. आयुष्यभर त्यांनी स्वतःची कामं स्वतःचं करणं पसंत केलं. ते १२९ व्या वर्षीही योगासने करत होते.

स्वामी शिवानंद बाबा १२९ वर्षे जगले. आम्ही १९९८ पासून त्यांना भेटत होतो. ते एक महान आत्मा होते जे सर्वांना समानतेने वागवत होते. १२९ व्या वर्षी त्यांनी असे योग केले जे आमच्या वयाचे लोकही करू शकत नाहीत; असे धर्मेंद्र सिंह टिंकू म्हणाले. टिंकू हे स्वामी शिवानंद सरस्वती यांचे शिष्य आणि मागील अनेक दशकांपासूनचे स्वामींचे शेजारी आहेत. स्वामीजी भेदभाव न करता सर्वांना अभिवादन करायचे. ते कधीही कोणावर अवलंबून नव्हते. साधे, स्वावलंबी आणि शिस्तीचे जीवन जगण्यावर त्यांनी भर दिला, असेही धर्मेंद्र सिंह टिंकू म्हणाले.

स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग साधना केली. तसेच गरीब, कुष्ठरोगी, वंचित यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर काम केले; असे स्वामींचे अनुयायी परिमल मुखर्जी म्हणाले.
Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र