पद्मश्री विजेत्या योगगुरू स्वामी शिवानंद यांचे वाराणसी येथे १२९ व्या वर्षी निधन

वाराणसी : प्रसिद्ध योगगुरू आणि पद्मश्री पुरस्कार विजेते स्वामी शिवानंद सरस्वती यांचे रविवार ४ मे रोजी १२९ व्या वर्षी निधन झाले. ते तपस्वी जीवनशैली आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी तसेच योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध होते. पंतप्रधान मोदींसह सार्वजनिक जीवनातील अनेक दिग्गजांनी, शिवानंद सरस्वती यांच्या शिष्यांनी आणि स्थानिकांनी दिवंगत स्वामी शिवानंद सरस्वती यांना आदरांजली वाहिली.



स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग क्षेत्रात अतुलनीय कार्य केले शिवाय वंचितांसाठी आयुष्य वेचले. योग आणि मानवतावादी कार्यातील योगदानासाठी २०२२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौविण्यात आले होते. स्वामी शिवानंद त्यांच्या साधेपणा, शिस्त आणि भक्तीसाठी ओळखले जात. आयुष्यभर त्यांनी स्वतःची कामं स्वतःचं करणं पसंत केलं. ते १२९ व्या वर्षीही योगासने करत होते.

स्वामी शिवानंद बाबा १२९ वर्षे जगले. आम्ही १९९८ पासून त्यांना भेटत होतो. ते एक महान आत्मा होते जे सर्वांना समानतेने वागवत होते. १२९ व्या वर्षी त्यांनी असे योग केले जे आमच्या वयाचे लोकही करू शकत नाहीत; असे धर्मेंद्र सिंह टिंकू म्हणाले. टिंकू हे स्वामी शिवानंद सरस्वती यांचे शिष्य आणि मागील अनेक दशकांपासूनचे स्वामींचे शेजारी आहेत. स्वामीजी भेदभाव न करता सर्वांना अभिवादन करायचे. ते कधीही कोणावर अवलंबून नव्हते. साधे, स्वावलंबी आणि शिस्तीचे जीवन जगण्यावर त्यांनी भर दिला, असेही धर्मेंद्र सिंह टिंकू म्हणाले.

स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग साधना केली. तसेच गरीब, कुष्ठरोगी, वंचित यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर काम केले; असे स्वामींचे अनुयायी परिमल मुखर्जी म्हणाले.
Comments
Add Comment

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर

Amazon Great Freedom Sale 2026 : स्वातंत्र्यदिनानिमित्त Amazon ची मोठी ऑफर! ७ ऑगस्टपासून फ्रीडम सेल सुरू; पाहा काय असणार खास ?

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'अ‍ॅमेझॉन'ने (Amazon) आपल्या भारतीय