Gram Flour : नाश्त्यामध्ये बेसन पोळी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही ? जाणून घ्या

मुंबई:रोजच्या नाश्त्याला दिवसातील सर्वात महत्त्वपूर्ण आहार मानतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात, ज्याचे निरीक्षण रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतारांद्वारे केले जाते.सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर रोहन सेहगल यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी बेसन पोळीसह लिंबाचे लोणचे, हिरव्या चटणीचे सेवन केले आणि त्याचा परिणाम तपासला.


बेसन पोळी खाल्ल्यानंतर काही तासांनी सहगल यांनी सांगितले की, माझ्या रक्तातील ग्लुकोज फक्त १६ मिलीग्रामने वाढले. माझ्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य होण्यासाठी फक्त १.५ तास लागला. हा परिणाम चांगला आहे, कारण बेसनमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, शिवाय ते खूप चविष्टही असतात,” असे सेहगल म्हणाले.



पण काही काळापूर्वीच मेटाबॉलिक हेल्थ कोच करण सरीन यांनीही त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर एका बेसन पोळीचा (५० ग्रॅम पिठापासून बनवलेला) परिणाम तपासला.त्यांच्या मते, वाढ ४० पेक्षा जास्त होती. “ती ३० पेक्षा कमी असायला हवी होती,”असे सरीन म्हणाले.या परस्परविरोधी निकालांमुळे इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीचे प्रत्यक्षात काय होते याचा शोध घेण्याचे ठरवले.


डॉ. के. हेमंत कुमार, सल्लागार म्हणाले की, ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) हा एक सामान्यतः वापरला जाणारा पॅरामीटर आहे, जो विविध पदार्थ रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवू शकतात हे मोजण्यास मदत करतो. रँकिंग ० ते १०० च्या स्केलवर आधारित आहे आणि उच्च जीआय असलेले पदार्थ रक्तातील साखरेची पातळी जलद वाढवतात. “मधुमेह असलेल्या लोकांसाठी उच्च जीआय असलेले पदार्थ त्यांच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवणे कठीण बनवू शकतात,” असे डॉ. कुमार म्हणाले.




Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात