Gram Flour : नाश्त्यामध्ये बेसन पोळी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही ? जाणून घ्या

  89

मुंबई:रोजच्या नाश्त्याला दिवसातील सर्वात महत्त्वपूर्ण आहार मानतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात, ज्याचे निरीक्षण रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतारांद्वारे केले जाते.सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर रोहन सेहगल यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी बेसन पोळीसह लिंबाचे लोणचे, हिरव्या चटणीचे सेवन केले आणि त्याचा परिणाम तपासला.


बेसन पोळी खाल्ल्यानंतर काही तासांनी सहगल यांनी सांगितले की, माझ्या रक्तातील ग्लुकोज फक्त १६ मिलीग्रामने वाढले. माझ्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य होण्यासाठी फक्त १.५ तास लागला. हा परिणाम चांगला आहे, कारण बेसनमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, शिवाय ते खूप चविष्टही असतात,” असे सेहगल म्हणाले.



पण काही काळापूर्वीच मेटाबॉलिक हेल्थ कोच करण सरीन यांनीही त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर एका बेसन पोळीचा (५० ग्रॅम पिठापासून बनवलेला) परिणाम तपासला.त्यांच्या मते, वाढ ४० पेक्षा जास्त होती. “ती ३० पेक्षा कमी असायला हवी होती,”असे सरीन म्हणाले.या परस्परविरोधी निकालांमुळे इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीचे प्रत्यक्षात काय होते याचा शोध घेण्याचे ठरवले.


डॉ. के. हेमंत कुमार, सल्लागार म्हणाले की, ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) हा एक सामान्यतः वापरला जाणारा पॅरामीटर आहे, जो विविध पदार्थ रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवू शकतात हे मोजण्यास मदत करतो. रँकिंग ० ते १०० च्या स्केलवर आधारित आहे आणि उच्च जीआय असलेले पदार्थ रक्तातील साखरेची पातळी जलद वाढवतात. “मधुमेह असलेल्या लोकांसाठी उच्च जीआय असलेले पदार्थ त्यांच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवणे कठीण बनवू शकतात,” असे डॉ. कुमार म्हणाले.




Comments
Add Comment

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत

Oral Health Cancer Risk: योग्यरित्या ब्रश न केल्यास कर्करोगाचा धोका! दिल्ली AIMS संशोधनात दावा

नवी दिल्ली: एम्स दिल्ली येथील संशोधकांनी अलिकडेच केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही तुमच्या