Gram Flour : नाश्त्यामध्ये बेसन पोळी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही ? जाणून घ्या

मुंबई:रोजच्या नाश्त्याला दिवसातील सर्वात महत्त्वपूर्ण आहार मानतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात, ज्याचे निरीक्षण रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतारांद्वारे केले जाते.सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर रोहन सेहगल यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी बेसन पोळीसह लिंबाचे लोणचे, हिरव्या चटणीचे सेवन केले आणि त्याचा परिणाम तपासला.


बेसन पोळी खाल्ल्यानंतर काही तासांनी सहगल यांनी सांगितले की, माझ्या रक्तातील ग्लुकोज फक्त १६ मिलीग्रामने वाढले. माझ्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य होण्यासाठी फक्त १.५ तास लागला. हा परिणाम चांगला आहे, कारण बेसनमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, शिवाय ते खूप चविष्टही असतात,” असे सेहगल म्हणाले.



पण काही काळापूर्वीच मेटाबॉलिक हेल्थ कोच करण सरीन यांनीही त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर एका बेसन पोळीचा (५० ग्रॅम पिठापासून बनवलेला) परिणाम तपासला.त्यांच्या मते, वाढ ४० पेक्षा जास्त होती. “ती ३० पेक्षा कमी असायला हवी होती,”असे सरीन म्हणाले.या परस्परविरोधी निकालांमुळे इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीचे प्रत्यक्षात काय होते याचा शोध घेण्याचे ठरवले.


डॉ. के. हेमंत कुमार, सल्लागार म्हणाले की, ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) हा एक सामान्यतः वापरला जाणारा पॅरामीटर आहे, जो विविध पदार्थ रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवू शकतात हे मोजण्यास मदत करतो. रँकिंग ० ते १०० च्या स्केलवर आधारित आहे आणि उच्च जीआय असलेले पदार्थ रक्तातील साखरेची पातळी जलद वाढवतात. “मधुमेह असलेल्या लोकांसाठी उच्च जीआय असलेले पदार्थ त्यांच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवणे कठीण बनवू शकतात,” असे डॉ. कुमार म्हणाले.




Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी