India Water Strike: सिंधू नंतर आता चिनाबचे पाणी थांबवले... पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवले

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानची चारही बाजूने मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केली आहे, पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध उचललेल्या पाऊलांमध्ये सिंधू पाणी वाटप करार (Indus Waters Treaty) ) रद्द केल्यानंतर, आता चिनाब नदी (Chenab River)चे पाणी देखील बागलीहार धरणा (Baglihar Dam) द्वारे रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे आणखीन एक पाणी भारताने पळवले आहे.

पाकिस्तान सोबतचा कित्येक वर्ष सुरू असलेला सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर, आता चिनाब नदीचे पाणी देखील अडवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे, हा पाकिस्तानसाठी भारताकडून आणखी एक जबरदस्त धक्का म्हणता येईल.

बागलीहार धरणातून पाणी अडवले जाणार 


सिंधू करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणीही पाकिस्तानसाठी बंद झाले आहे. त्यानंतर आता चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी धरणाद्वारे अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार प्रकल्पातील पाणी नियंत्रित करण्याची क्षमता भारताकडे आहे. तसंच, झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

बागलीहार प्रकल्पावरून दीर्घकालीन वाद


जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

बागलीहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानने यापूर्वीही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जागतिक बँकेकडे मध्यस्थतेची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, किशनगंगा प्रकल्पामुळे झेलमची उपनदी नीलम नदीच्या प्रवाहावर होणाऱ्या परिणामांविषयीही पाकिस्तानने आक्षेप नोंदवले आहेत.

 
Comments
Add Comment

Amazon CEO Andy Jassy : ॲमेझॉनची भारतात २०३० पर्यंत ४८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार; अँडी जेसी यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर केली घोषणा

नवी दिल्ली : जगातील आघाडीची ई-कॉमर्स आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ॲमेझॉनने गुरुवारी भारतात २०२६ ते

Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर थरारक प्रसंग! एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने आली समोरासमोर; मोठा अपघात टळला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर बुधवार २४ जून रोजी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली

Air India Plane : एअर इंडियाचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) च्या विमानासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे

Indian Passport : पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी; MEA ने नागरिकत्वाबाबत दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट (Indian Passport) हा नागरिकत्वाचा (Citizenship) पुरावा नसून तो केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International Travel)

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी