अमुल पाठोपाठ गोकुळचे दूध महागले

मुंबई : 'अमुल' पाठोपाठ 'गोकुळ'चे दूध महागले. महाराष्ट्र दिनापासून 'अमुल'ने म्हैस आणि गायीच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. तसेच अर्धा लिटरच्या म्हैस आणि गायीच्या दुधाच्या किमतीत एक रुपयाची वाढ केली. आता 'गोकुळ'च्या दुधाच्या दरात वाढ झाली आहे. कोल्हापूर दूध उत्पादक संघाने पत्रक काढून दरवाढ जाहीर केली. कोल्हापूरातून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात वितरीत होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवे दर ४ मेपासून लागू झाले आहेत. टोण्ड ताजा आणि गोकुळ शक्तीच्या दुधाच्या किंमतीत कोणताही बदल नाही.


गोकुळ ब्रँडच्या फुल क्रीम क्लासिक दुधाची किंमत प्रति लिटर ७४ रुपये झाली आहे. तर फुल क्रीम दुधाची किंमत पाच लिटरच्या पॅकसाठी ३६५ रुपये असेल. गाय दूध सात्विक या दुधाची किंमत प्रति लिटर ५८ रुपये असेल. दरवाढीमुळे दूध उत्पादकांना फायदा होणार आहे आणि ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.


गोकुळ दुधाचा प्रामुख्याने कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खप होतो. यामुळे या जिल्ह्यांतील 'गोकुळ'च्या ग्राहकांच्या खिशावर दूध दरवाढीचा ताण येणार आहे. ग्राहकांना दुधासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र