अमुल पाठोपाठ गोकुळचे दूध महागले

  68

मुंबई : 'अमुल' पाठोपाठ 'गोकुळ'चे दूध महागले. महाराष्ट्र दिनापासून 'अमुल'ने म्हैस आणि गायीच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. तसेच अर्धा लिटरच्या म्हैस आणि गायीच्या दुधाच्या किमतीत एक रुपयाची वाढ केली. आता 'गोकुळ'च्या दुधाच्या दरात वाढ झाली आहे. कोल्हापूर दूध उत्पादक संघाने पत्रक काढून दरवाढ जाहीर केली. कोल्हापूरातून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात वितरीत होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवे दर ४ मेपासून लागू झाले आहेत. टोण्ड ताजा आणि गोकुळ शक्तीच्या दुधाच्या किंमतीत कोणताही बदल नाही.


गोकुळ ब्रँडच्या फुल क्रीम क्लासिक दुधाची किंमत प्रति लिटर ७४ रुपये झाली आहे. तर फुल क्रीम दुधाची किंमत पाच लिटरच्या पॅकसाठी ३६५ रुपये असेल. गाय दूध सात्विक या दुधाची किंमत प्रति लिटर ५८ रुपये असेल. दरवाढीमुळे दूध उत्पादकांना फायदा होणार आहे आणि ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.


गोकुळ दुधाचा प्रामुख्याने कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खप होतो. यामुळे या जिल्ह्यांतील 'गोकुळ'च्या ग्राहकांच्या खिशावर दूध दरवाढीचा ताण येणार आहे. ग्राहकांना दुधासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस