क्षेपणास्त्र हल्ला झाला म्हणून एअर इंडियाच्या विमानाचा मार्ग बदलला

तेल अवीव : येमेनमधून हुती अतिरेक्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावर हल्ला केला. इस्रायलच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेने या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार केला. अतिरेक्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे एअर इंडियाचे दिल्ली - तेल अवीव विमान तातडीने अबुधाबीला वळविण्यात आले. हे विमान अबुधाबीच्या विमानतळावर उतरले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमान लवकरच दिल्लीला परत येणार आहे.



एअर इंडियाच्या AI 139 या बोईंग ७८७ प्रकारच्या प्रवासी विमानाने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. हे विमान इस्रायलमध्ये तेल अवीव येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. पण अतिरेक्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आकाशात आयत्यावेळी एअर इंडियाच्या विमानाचा मार्ग बदलण्यात आला. विमान तेल अवीव ऐवजी अबुधाबीला रवाना झाले. विमान जॉर्डनच्या हवाई हद्दीतून उडत असताना मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अतिरेक्यांनी तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सहा जणांना किरकोळ दुखापत झाली. जखमींवर उपचार सुरू आहेत. क्षेपणास्त्र हल्ला होत असल्याचा अंदाज येताच इस्रायलने तातडीने तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावरील कामकाज थांबवले होते. विमानतळावर येत असलेली सर्व विमानं दुसऱ्या मार्गांवर वळवण्याचा निर्णय झाला. यानंतर एअर इंडियाच्या विमानाच्या मार्गात बदल करण्यात आला. प्रत्यक्ष हल्ला होण्याआधीच इस्रायलने विमानतळावर उड्डाण आणि लँडिंग थांबवले होते. दिल्ली - तेल अवीव हे विमान अबुधाबीला उतरवण्यात आले. नंतर हे विमान अबुधाबीतूनच परत दिल्लीला पाठवण्याचा निर्णय झाला. तेल अवीव - दिल्ली हे उड्डाण रद्द करण्यात आले.

तेल अवीवसाठीची सर्व उड्डाणं रद्द

भारतातून तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणं ६ मे पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Comments
Add Comment

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना