Stampede at Goa Temple: लैराई देवीच्या जत्रोत्सवाला गालबोट! चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू तर ३० हून अधिक भाविक जखमी

गोवा: गोव्यातील शिरगाव येथे आयोजित श्री लैराई जत्रेदरम्यान लाराई मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede at Goa Temple) ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अचानक गर्दीत घबराट पसरल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे, यामुळे लोकं जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले, ज्यामुळे परिस्थिती अत्यंत भयावह बनली.


घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले, तसेच मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले. चेंगराचेंगरीमागील कारण अद्याप माहित झाले नसले तरी, प्राथमिक अहवालानुसार गर्दी आणि योग्य व्यवस्थेच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येते.



लैराई जत्रेमध्ये हजारो भाविक आले होते


शुक्रवारी सुरू झालेल्या श्रीदेवी लैराई जत्रेमध्ये हजारो भाविक आले होते. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुमारे १,००० पोलिस अधिकारी आणि ड्रोनचा वापर करण्यात आला होता.



लैराई जत्रेची जुनी परंपरा


गोव्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशात लैराई देवीचे विशेष स्थान आहे. शिरगाव येथील श्री देवी लैराई देवस्थानात हजारो भाविक शांती, समृद्धी आणि आनंदासाठी आशीर्वाद घेण्यासाठी येतात. हिरवळीने वेढलेले हे मंदिर प्रार्थना आणि चिंतनासाठी एक शांत वातावरण प्रदान करते. हे मंदिर उत्तर आणि दक्षिणेकडील स्थापत्य शैलींच्या मिश्रणासाठी ओळखले जाते, दर मे महिन्यात येथे जत्रा भरते.


देवी पार्वतीचा अवतार मानल्या जाणाऱ्या लैराई देवींच्या दर्शनासाठी गोवा आणि परदेशातील भाविक एकत्र येतात . परंपरेत खोलवर रुजलेला हा उत्सव अद्वितीय विधी आणि एक नेत्रदीपक सोहळा प्रदर्शित करतो. गोवा पर्यटन वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे, मौलिंगेमसह जवळपासच्या भागातील ग्रामस्थ दिवसभर देवी लैराईला समर्पित धार्मिक विधी आणि अर्पणांमध्ये सहभागी होतात. लैराई जत्रेदरम्यान मध्यरात्रीच भाविक मंदिरात जमतात. भाविक मंदिराच्या आत ढोल-ताशांच्या तालात काठ्या वाजवत नृत्य सादर करतात. नृत्य सत्रांच्या शेवटी,एक व्यक्ती मंदिराजवळ एक भव्य शेकोटी पेटवतो, पहाटेच्या वेळी, ही शेकोटी विझल्यानंतर, त्याच्या गरम निखाऱ्यावरून अनवाणी चालण्याचा विधी सुरू होतो.



आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व


भक्त देवी लैराईचे नाव घेत निखाऱ्यांमधून धावतात, काही जण हे अनेक वेळा करतात. त्यानंतर, ते त्यांची माळ वडाच्या झाडावर टाकून घरी जातात, कारण सूर्योदयाने उत्सव संपतो.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे