Sant Dnyaneshwar Maharaj Janmotsav : माऊलींचा ७५०व्या जन्मोत्सव सोहळा! 'ज्ञानोबा माऊली'च्या जपात आळंदीत भाविकांची मांदियाळी

७ दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन


आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संत नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा आणि संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा याचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू’, असे म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा ओघ आळंदीत सुरू झाला आहे. (Sant Dnyaneshwar Maharaj Janmotsav )



सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी निरनिराळ्या सुविधा देण्यासाठी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, आळंदीकर ग्रामस्थ भाविकांना सुरक्षा, सुविधा देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. (Sant Dnyaneshwar Maharaj Janmotsav)


दरम्यान, आज सकाळी ज्ञानेश्वरी पूजन आणि विनापूजन करत या सोहळाला सुरुवात करण्यात आली. हे पूजन वारकरी संप्रदायात असणारे मुख्य सांप्रदाय प्रमुख डॉ. नारायण जाधव महाराज यांच्याहस्ते करण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आले आहे. तसेच जन्मोसवानिमित्त वारकरी सप्रदायाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे.



मुख्यमंत्री लावणार हजेरी


आजपासून १० मे पर्यंत आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमंत्रण दिले असून सोहळ्यात त्यांची हजेरी लागेल, अशी अपेक्षा आहे. (Sant Dnyaneshwar Maharaj Janmotsav)

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद