10th Board Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षा शुल्कात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी १०वी आणि १२वीच्या परीक्षा घेतल्या जातात. करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जातात. यामुळे १०वी किंवा १२वीत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक सतत दबावात असतात. यशस्वी होऊ का असा प्रश्न त्यांना सतावत असतो. तर अशा चिंतेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या परीक्षेच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.


दहावीच्या २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षासाठी ५२० रुपये परीक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय झाला आहे. याआधी २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षात पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देत असलेल्यांसाठी परीक्षा शुल्क ४७० रुपये होते. यामुळे २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षात पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देत असलेल्यांना आधीच्या वर्षाच्या तुलनेत परीक्षा शुल्क म्हणून जास्तीचे ५० रुपये मोजावे लागणार आहेत. परीक्षा शुल्कात थेट ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.



दहावीच्या परीक्षा शुल्कात ५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत झाला. यावर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत परीक्षा शुल्कवाढीचा मुद्दा चर्चेला आला होता. या चर्चेनंतर निर्णय घेत फक्त परीक्षा शुल्कात वाढ झाली. इतर शुल्कांमध्ये जसे प्रशासकीय शुल्क, गुणपत्रक शुल्क व प्रमाणपत्र शुल्कात कोणताही बदल केला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर मिळणाऱ्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे लॅमिनेट स्वरूपात दिली जातात. यासाठी प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारले जात आहे, हे शुल्क देखील विद्यार्थ्यांकडूनच घेतले जाते. असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७