Earthquake : जम्मू- काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के

  103

नवी दिल्ली : जम्‍मू काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्‍के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


गुजरातमध्ये काल (दि २) रात्री ३.४ तीव्रतेचा भूकंप झाला. तर जम्‍मू काश्मीरमध्ये रात्री झालेल्‍या भूकंपाची तीव्रता २.७ इतकी नोंदवली गेली. लेह लडाखमध्येही भूकंपाचे धक्‍के जाणवले आहेत. या ठिकाणच्या भूकंपाची तीव्रता ३.९ इतकी नोंदवली गेली. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (जीएसडीएमए) नुसार, गुजरात भूकंपाच्या बाबतीत उच्च जोखीम असलेले क्षेत्र आहे. गेल्या २०० वर्षांत येथे ९ मोठे भूकंप झाले आहेत.



जीएसडीएमएच्या मते, २६ जानेवारी २००१ रोजी कच्छमध्ये झालेला भूकंप गेल्या २ शतकांमध्ये भारतात आलेला तिसरा सर्वात मोठा भूकंप होता. अंदाजे १३ हजार ८०० लोक मृत्युमुखी पडले आणि १ लाख ६७ हजार लोक जखमी झाले. पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडणाऱ्या नैसर्गिक घटनांमुळे भूकंप होतात. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेत होणाऱ्या ताणतणाव आणि क्रियाकलापांमुळे हे प्रामुख्याने आपत्ती म्हणून घडतात. भारतात भूकंप येण्याचे मुख्य कारण म्हणजे हिमालयीन प्रदेशातील टेक्टोनिक क्रियाकल्‍प. येथील तणाव भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील होणाऱ्या धडकेमुळे आहे. यामुळे ऊर्जा निर्माण होते आणि भूकंप होतात.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या