'दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करणार'

नवी दिल्ली : दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करू, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ते अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्काल्व्हेस लॉरेन्को यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या लष्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले होते.एकूण चार हल्लेखोरांपैकी दोन हल्लेखोर पाकिस्तानचे नागरिक असल्याचे पुरावे भारताला मिळाले. हल्लेखोरांपैकी एक पाकिस्तानच्या सैन्याचा कमांडो असल्याचे पुरावे भारताच्या हाती आले आहेत.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदींनी इशारा दिला होता की सरकार न्याय देणार. प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखू, शोधू आणि शिक्षा करू. गरज पडली तर त्यांचा पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठलाग करू पण न्याय करू असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यानंतर अंगोलाच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करणार असल्याचे सांगितले.

भारताने पाकिस्तान विरुद्ध केलेली कारवाई

  1. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित

  2. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द

  3. अटारी सीमा बंद, भारत - पाकिस्तान व्यापार बंद

  4. पाकिस्तानच्या भारतीय दुतावासातील अधिकारी - कर्मचारी यांची संख्या कमी केली

  5. भारत - पाकिस्तान टपाल सेवा, विमान वाहतूक, जहाज वाहतूक, रस्ते मार्गाने होणारी वाहतूक आणि रेल्वे मार्गाने होणारी वाहतूक बंद

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव