'दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करणार'

  76

नवी दिल्ली : दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करू, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ते अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्काल्व्हेस लॉरेन्को यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या लष्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले होते.एकूण चार हल्लेखोरांपैकी दोन हल्लेखोर पाकिस्तानचे नागरिक असल्याचे पुरावे भारताला मिळाले. हल्लेखोरांपैकी एक पाकिस्तानच्या सैन्याचा कमांडो असल्याचे पुरावे भारताच्या हाती आले आहेत.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदींनी इशारा दिला होता की सरकार न्याय देणार. प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखू, शोधू आणि शिक्षा करू. गरज पडली तर त्यांचा पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठलाग करू पण न्याय करू असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यानंतर अंगोलाच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करणार असल्याचे सांगितले.

भारताने पाकिस्तान विरुद्ध केलेली कारवाई

  1. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित

  2. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द

  3. अटारी सीमा बंद, भारत - पाकिस्तान व्यापार बंद

  4. पाकिस्तानच्या भारतीय दुतावासातील अधिकारी - कर्मचारी यांची संख्या कमी केली

  5. भारत - पाकिस्तान टपाल सेवा, विमान वाहतूक, जहाज वाहतूक, रस्ते मार्गाने होणारी वाहतूक आणि रेल्वे मार्गाने होणारी वाहतूक बंद

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे