'दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करणार'

नवी दिल्ली : दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करू, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ते अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्काल्व्हेस लॉरेन्को यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या लष्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले होते.एकूण चार हल्लेखोरांपैकी दोन हल्लेखोर पाकिस्तानचे नागरिक असल्याचे पुरावे भारताला मिळाले. हल्लेखोरांपैकी एक पाकिस्तानच्या सैन्याचा कमांडो असल्याचे पुरावे भारताच्या हाती आले आहेत.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदींनी इशारा दिला होता की सरकार न्याय देणार. प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखू, शोधू आणि शिक्षा करू. गरज पडली तर त्यांचा पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठलाग करू पण न्याय करू असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यानंतर अंगोलाच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करणार असल्याचे सांगितले.

भारताने पाकिस्तान विरुद्ध केलेली कारवाई

  1. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित

  2. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द

  3. अटारी सीमा बंद, भारत - पाकिस्तान व्यापार बंद

  4. पाकिस्तानच्या भारतीय दुतावासातील अधिकारी - कर्मचारी यांची संख्या कमी केली

  5. भारत - पाकिस्तान टपाल सेवा, विमान वाहतूक, जहाज वाहतूक, रस्ते मार्गाने होणारी वाहतूक आणि रेल्वे मार्गाने होणारी वाहतूक बंद

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन