लोकांकडे अजूनही २००० रुपयांच्या नोटा! ६,२६६ कोटी अद्याप पडून... कसे आणि कुठे जमा करायचे? जाणून घ्या

RBI च्या अहवालातून महत्वाची माहिती समोर


मुंबई: रिझर्व्ह बँकेने (RBI) २००० रुपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय घेऊन जवळजवळ दोन वर्षे झाली आहेत, परंतु या नोटांपैकी मोठ्या प्रमाणात नोटा अजूनही लोकांकडे पडून आहेत. हे इतके मोठे आहेत की त्यांची एकूण किंमत तब्बल ६२६६ कोटी रुपये आहे. आरबीआयने शुक्रवारी सादर केलेल्या अहवालाद्वारे ही माहिती दिली आहे. नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतरही २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर चलनात राहतील. रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती.

आरबीआयने शुक्रवारी दिनांक २ मे रोजी एका निवेदनात म्हटले आहे की, १९ मे २०२३ रोजी व्यवहार बंद होताना २००० रुपयांच्या एकूण नोटांचे मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते, ते ३० एप्रिल २०२५ रोजी व्यवहार बंद होताना ६,२६६ कोटी रुपयांवर आले आहे. अशाप्रकारे, १९ मे २०२३ पर्यंत, चलनात असलेल्या २००० रुपयांच्या ९८.२४ टक्के नोटा परत आल्या आहेत.



कुठे जमा कराल 2000 रुपयांचा नोटा?


ज्या लोकांकडे अजूनही २००० रुपयांच्या नोटा असतील तर ते आताही या नोटा जमा करू शकतात. यासाठी रिझर्व्ह बँकेच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये जावे लागेल, कारण २०००च्या नोटा बँक शाखांमध्ये जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा फक्त ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत उपलब्ध होती. ९ ऑक्टोबर २०२३ पासून, आरबीआयची जारी कार्यालये व्यक्ती आणि संस्थांकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी २००० रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत. याशिवाय, लोक भारतीय पोस्टाद्वारे देशातील कोणत्याही आरबीआय इश्यू ऑफिसमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलू शकतात. हे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात.

Comments
Add Comment

'बालिका वधू'ची आनंदी विवाहबंधनात! लग्नानंतर 'सिंदूर-मंगळसूत्र' लूकमध्ये पतीसोबत दिसली

टीव्ही अभिनेत्री अविका गोर आणि मिलिंद चंदवाणी अडकले विवाहबंधनात; राष्ट्रीय टीव्हीवर होणार प्रसारण मुंबई:

सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती : मंत्री ॲड.आशिष शेलार

नांदोश गढीचे उत्खनन, रामगड ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याचा निर्णय मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा हा

रेणुका शहाणेचा ५९ वा वाढदिवस, दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा!

मुंबई : सलमान खानसोबत पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी मराठी

'फिर से गुड न्यूज' भारती आणि हर्षने खास पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी!

मुंबई : आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि

“तुम्ही संत्री कशी खाता?” : FICCI Frames 2025 मध्ये अक्षय कुमारने फडणवीसांना विचारला गंमतीशीर प्रश्न !

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मिश्कील शैलीसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना

मेट्रो ३ मार्गिकेचा लोकार्पण सोहळा: मुंबईकरांना मिळणार जलद आणि सोयीस्कर प्रवास

मुंबई :  मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी एक ऐतिहासिक आणि महत्वाचा बदल घडणार आहे. आता, आरे रोड ते कफ परेड दरम्यान