Pakistan Flood : पाकिस्तानचा धोका वाढला! काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे येणार पुराच्या लाटा

श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देश हादरुन गेलं आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊल उचलले आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्यासह अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकिकडे भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरली असताना दुसरीकडे पाकिस्तानला नैसर्गिक आपत्तीचा देखील सामना करावा लागणार आहे.



सध्या जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून यामुळे पाकिस्तानमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे (४०-६० किमी/ताशी) वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.



काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात आला होता पूर 


गेल्या महिन्यात २६ एप्रिल २०२५ रोजी भारताने पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हट्टिन बाला भागात झेलम नदीत पाणी सोडले होते. यामुळे मुझफ्फराबादमध्ये अचानक मोठा पूर आला होता. यानंतर, मुझफ्फराबाद प्रशासनावर वॉटर इमर्जन्सी जाहीर करण्याची वेळ आली होती.



दिल्लीत पावसाचा कहर


सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दिल्ली-एनसीआरमध्ये आपत्तीचे रूप धारण केले. दिल्लीतील द्वारका येथे पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एका घरावर झाड कोसळले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खारखरी कालवा गावात एका शेतात बांधलेल्या ट्यूबवेलच्या खोलीवर एक झाड पडले. या खोलीत एकूण पाच लोक झोपले होते. ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. मृतांची ओळख २६ वर्षीय ज्योती आणि तिची तीन मुले अशी झाली आहे. तर ज्योतीचा पती अजय किरकोळ जखमी झाला आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Narendra Modi: पंतप्रधान मोदी आज अनेक देशांच्या राष्ट्रध्यक्षांना भेटणार; स्पेन, फिनलंड, सर्बियासह..

दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अनेक देशांच्या

भारत-यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा पाठिंबा

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन; तंत्रज्ञान, संरक्षण व व्यापार सहकार्यात समान सूत्र मुंबई : "भारत-फ्रान्स

जगातील दोन सर्वोत्तम ‘इनोवेशन हब्स’ एकत्र

२०२६ हे ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा मुंबई : भारत आणि फ्रान्स या दोन

Emmanuel Macron India Visit: भारत-फ्रान्स धोरणात्मक संबंधांचा नवा अध्याय

- मुंबईत मोदी-मॅक्रोन यांच्यात द्विपक्षीय बैठक; टाटा-एअरबस हेलिकॉप्टर प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई : भारत आणि