Railway Megablock : मध्य व पश्चिम रेल्वेचा ‘मेगाब्लॉक’ रद्द! नेमके कारण काय?

  74

मुंबई : प्रत्येक आठवड्याच्या रविवार दिवशी मुंबई लोकलबाबत (Mumbai Local) तांत्रिक बिघाड दुरुस्तीची किंवा इतर कामे हाती घेतली जातात. त्यामुळे रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. येत्या रविवारी देखील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने यंत्रणा दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असल्याचे जाहीर केले होते. मात्र रविवार ४ मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करता रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक रद्द केला आहे.



वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट (एनईईटी-२०२५) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा प्रवास सुरळीत राहावा, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने रविवारी (ता. ४) रोजीचा उपनगरीय मार्गांवर नियोजित असलेला मेगा ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी कोणताही मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नीट परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रवासात अडथळा येणार नाही.



पश्चिम रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक


पश्चिम रेल्वेनेदेखील रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान अप व डाऊन फास्ट लाइनवर शनिवारी (ता. ३) मध्यरात्री १२.१५ ते ४.१५ दरम्यान चार तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या वेळी जलद गाड्या सांताक्रूझ ते चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील, अशी माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये