Google News : गुगलवर 'हे' सर्च केले तर होईल तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने कठोर कारवाई सुरू केली आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. संशयितांची तपासणी करुन त्यात पाकिस्तानी आढळले आणि ते देश सोडत नसतील त्यांची हकालपट्टी करण्याचे काम सुरू आहे.


दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रचार - प्रसार टाळण्यासाठी अनेक सोशल मीडिया अकाउंट पुढील सूचनेपर्यंत ब्लॉक करण्यात आली आहेत. या वातावरणात गूगलवर भलतेसलते शब्द टाकून सर्च करणे धोक्याचे आहे. हे सर्च तुम्हाला थेट तुरुंगात ढकलू शकते.



कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करू नये ?


बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ बनवण्याच्या पद्धतीबद्दल शोधत असाल तर पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. जर तुम्ही बॉम्ब किंवा कोणत्याही प्रकारची स्फोटक सामग्री बनवण्याच्या पद्धतीबद्दल सर्च केले तर त्यामुळे तुम्ही सुरक्षा एजन्सींच्या रडारवर येऊ शकता. या गोष्टी संवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत, सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात आणि अटक देखील करू शकतात.


तुम्ही जर शस्त्रे आणि दहशतवादी संघटनेबाबत सर्च करत असाल तर तुम्ही दहशतवाद्यांच्या विचारसरणीबाबत सर्च केले, दहशतवादी कशी तयारी करतात, याचे व्हिडीओ गुगलवर पाहत असल्यास सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात. त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Comments
Add Comment

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा