Google News : गुगलवर 'हे' सर्च केले तर होईल तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने कठोर कारवाई सुरू केली आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. संशयितांची तपासणी करुन त्यात पाकिस्तानी आढळले आणि ते देश सोडत नसतील त्यांची हकालपट्टी करण्याचे काम सुरू आहे.


दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रचार - प्रसार टाळण्यासाठी अनेक सोशल मीडिया अकाउंट पुढील सूचनेपर्यंत ब्लॉक करण्यात आली आहेत. या वातावरणात गूगलवर भलतेसलते शब्द टाकून सर्च करणे धोक्याचे आहे. हे सर्च तुम्हाला थेट तुरुंगात ढकलू शकते.



कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करू नये ?


बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ बनवण्याच्या पद्धतीबद्दल शोधत असाल तर पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. जर तुम्ही बॉम्ब किंवा कोणत्याही प्रकारची स्फोटक सामग्री बनवण्याच्या पद्धतीबद्दल सर्च केले तर त्यामुळे तुम्ही सुरक्षा एजन्सींच्या रडारवर येऊ शकता. या गोष्टी संवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत, सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात आणि अटक देखील करू शकतात.


तुम्ही जर शस्त्रे आणि दहशतवादी संघटनेबाबत सर्च करत असाल तर तुम्ही दहशतवाद्यांच्या विचारसरणीबाबत सर्च केले, दहशतवादी कशी तयारी करतात, याचे व्हिडीओ गुगलवर पाहत असल्यास सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात. त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Comments
Add Comment

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.