Google News : गुगलवर 'हे' सर्च केले तर होईल तुरुंगवासाची शिक्षा

  71

मुंबई : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने कठोर कारवाई सुरू केली आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. संशयितांची तपासणी करुन त्यात पाकिस्तानी आढळले आणि ते देश सोडत नसतील त्यांची हकालपट्टी करण्याचे काम सुरू आहे.


दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रचार - प्रसार टाळण्यासाठी अनेक सोशल मीडिया अकाउंट पुढील सूचनेपर्यंत ब्लॉक करण्यात आली आहेत. या वातावरणात गूगलवर भलतेसलते शब्द टाकून सर्च करणे धोक्याचे आहे. हे सर्च तुम्हाला थेट तुरुंगात ढकलू शकते.



कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करू नये ?


बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ बनवण्याच्या पद्धतीबद्दल शोधत असाल तर पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. जर तुम्ही बॉम्ब किंवा कोणत्याही प्रकारची स्फोटक सामग्री बनवण्याच्या पद्धतीबद्दल सर्च केले तर त्यामुळे तुम्ही सुरक्षा एजन्सींच्या रडारवर येऊ शकता. या गोष्टी संवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत, सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात आणि अटक देखील करू शकतात.


तुम्ही जर शस्त्रे आणि दहशतवादी संघटनेबाबत सर्च करत असाल तर तुम्ही दहशतवाद्यांच्या विचारसरणीबाबत सर्च केले, दहशतवादी कशी तयारी करतात, याचे व्हिडीओ गुगलवर पाहत असल्यास सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात. त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Comments
Add Comment

Hide Tide Alert: विक्रमी पावसानंतर मुंबईत भरतीचा इशारा, मुंबईच्या चौपाट्यांवर न जाण्याचे आवाहन

आज समुद्र खवळणार मुंबईत हाय टाइड अलर्ट जारी जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान

Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

‘१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आराखडा तयार करा’

केंद्र सरकारकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५

अखेर कर्नाक पुलाला आता लोकार्पणाची प्रतीक्षा

बुधवारी रात्री उशिरापर्यंत पूल विभागाने फिरवला शेवटचा हात मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर

मनाने, शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल

विश्वास नांगरे-पाटील यांनी महापालिका शाळांमधील मुलांच्या पंखात भरले बळ मुंबई  : सध्याच्या विद्यार्थ्यांभोवती,

पवई तलावातील सांडपाण्याचा प्रवेश मार्ग कायमचाच बंद

मुंबई : पवई तलावामध्ये येणारे सांडपाणी आदींवर अखेर बंद केले जाणार असून पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या शेवटच्या