Google News : गुगलवर 'हे' सर्च केले तर होईल तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने कठोर कारवाई सुरू केली आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. संशयितांची तपासणी करुन त्यात पाकिस्तानी आढळले आणि ते देश सोडत नसतील त्यांची हकालपट्टी करण्याचे काम सुरू आहे.


दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रचार - प्रसार टाळण्यासाठी अनेक सोशल मीडिया अकाउंट पुढील सूचनेपर्यंत ब्लॉक करण्यात आली आहेत. या वातावरणात गूगलवर भलतेसलते शब्द टाकून सर्च करणे धोक्याचे आहे. हे सर्च तुम्हाला थेट तुरुंगात ढकलू शकते.



कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करू नये ?


बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ बनवण्याच्या पद्धतीबद्दल शोधत असाल तर पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. जर तुम्ही बॉम्ब किंवा कोणत्याही प्रकारची स्फोटक सामग्री बनवण्याच्या पद्धतीबद्दल सर्च केले तर त्यामुळे तुम्ही सुरक्षा एजन्सींच्या रडारवर येऊ शकता. या गोष्टी संवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत, सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात आणि अटक देखील करू शकतात.


तुम्ही जर शस्त्रे आणि दहशतवादी संघटनेबाबत सर्च करत असाल तर तुम्ही दहशतवाद्यांच्या विचारसरणीबाबत सर्च केले, दहशतवादी कशी तयारी करतात, याचे व्हिडीओ गुगलवर पाहत असल्यास सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात. त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास